विद्यापीठात कुलगुरुंच्या दालनात आंदोलन

    07-Dec-2018
Total Views | 21


मुंबई : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सर्व सिनेट सदस्यांनी कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्या दालनात शुक्रवारी आंदोलन केले.

 

'विद्यार्थी प्रश्न मार्गी लावा, गोड बोलणे बंद करा', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विद्यापीठातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी निवदने देण्यात आली होती. परंतु; कुलगुरूंनी याप्रकरणी काहीही ठोस कारवाई केली नाही. सिनेट सदस्यांच्या पत्रांनाही उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सर्व सिनेट सदस्यांनी शुक्रवारी थेट मुंबई फोर्ट येथील कुलगुरू कार्यालयात ठिय्या मांडला. कुलगुरुंविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

 

रत्नागिरी उप केंद्राची झालेली अवस्था, विद्यापीठाचा परीक्षा विभागाने नव्या उत्तर पत्रिका छापणाच्या घेतलेला निर्णय, शा अनेक मागण्यासंदर्भात कुलगुरू कार्यालयाकांडून उत्तर मिळालेले नाही. याच्या निषेधार्थ म्हणून सिनेट सदस्यांकडून हातात पोस्टर्स घेऊन सुहास पेडणेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'कुलगुरू गोड बोलणे बंद करा, पत्रांना उत्तर द्या' अशा घोषणा देत कुलगुरूंच्यासमोरच जमिनीवर बसून सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, सुप्रिया कारंडे, वैभव थोरात, शशिकांत झोरे, शीतल देवरुखकर यांच्यासह कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121