काश्मीर : २ चकमकींत ६ दहशतवादी ठार

    19-Oct-2018
Total Views | 12


 


श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींत एकूण ६ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले. यापैकी पहिल्या चकमकीत पोलीस चौकीवर हल्ला करणारे २ दहशतवादी ठार करण्यात आले तर दुसऱ्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. सैन्यदलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामुल्लामधील क्राल्हार भागात श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त चौकीपाशी एक संशयास्पद वाहन प्रवास करताना आढळले.

 

या गाडीला थांबण्यास सांगितले असता, गाडीतील दोघांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात गाडीतील दोघे ठार झाले. दुसरीकडे बारामुल्लामध्येच रामपूर भागात नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीबाबत सुरक्षा दलांना पूर्वसूचना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या भागात शोधमोहीम राबवली. यावेळी लपून बसलेल्या घुसखोरांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तीन घुसखोर ठार झाले. या दोन्ही चकमकीत ठार झालेल्या पाचही दहशतवाद्यांची नावे व त्यांची संघटना याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121