कडोंमपाच्या माजी महापौरांचे जात प्रमाणपत्र अवैध

    13-Oct-2018
Total Views | 22


 


कल्याण: शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचे जात प्रमाणपत्र ठाणे जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. वैजयंती घोलप यांनी इतके वर्ष त्यांची खरी जात लपवून खोट्या प्रमाणपत्राचा वापर करत जनतेच्या व निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धूळ टाकत नगरसेवक पद भूषवले व याच दरम्यान त्यांनी क.डो. म.पा चे त्या वेळी आरक्षित असलेले मानाचे महापौर पद देखील याच खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर मिळवले होते. तसेच घोलप यांनी स्वतःची जात लपवत त्यांनी इतकी वर्षे पदे भूषविल्याचा आरोप भाजपचे गौरव गुजर यांनी केला होता.

 

त्यांच्या या दाव्याला उच्च न्यायालयात आव्हान देत वैजयंती घोलप यांचे सगळे पुरावे खोटे सिद्ध करत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे १०० वर्षांपूर्वीचे जुने दस्तऐवज न्यायालयात सादर करण्यात आले. या आधारावर वैजयंती घोलप यांची जात धनगर नसून त्या खाटीक समाजाच्या आहेत हे सिद्ध केले. उच्च न्यायालयाने त्वरित ठाणे जात पडताळणी समितीला घोलप यांच्या कागदपत्रांची सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय देण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे जात पडताळणी समितीने सर्व दस्तऐवज दक्षता पथकामार्फत तपासले असता ते सर्व खोटे आढळले व गौरव गुजर यांनी दिलेले आव्हान योग्य असल्याचे नमूद करत त्या मार्गाने पुढील तपास करत निष्कर्षापर्यंत पोहोचले.

 

ठाणे जात पडताळणी समितीने वैजयंती घोलप यांचा धनगर असल्याचा दावा फेटाळून लावत त्यांचे सर्व दस्तऐवज व जात प्रमाणपत्र जप्त केले आहेत. याबाबत आयोगाने महापालिकेलाही कळविले आहे. या कामात गौरव गुजर यांचे वकील अॅड. चिंतामणी बनगोजी व अॅड. हमीद मुल्ला यांनी उच्च न्यालयात व जात पडताळणी समिती समोर गौरव गुजर यांची बाजू अत्त्यंत प्रामाणिकपणे मंडळी व खोट्या दाव्याला विरोध करत वैजयंती घोलप यांनी २५ वर्ष जे जनतेपासून व निवडणूक आयोगापासून लपवून ठेवले ते बाहेर काढले.त्यामुळे त्याचे नगरसेवक पद ही धोक्यात आले आहे . यासंदर्भात माहिती साठी घोलप यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121