इस्त्रायल-इराण युद्धबंदीनंतर इस्त्रायलने आपला मोर्चा हमासकडे वळवला आहे. इस्त्रायली सैन्याने रविवार, दि. २९ जून रोजी पॅलेस्टिनींना उत्तर गाझातील रहिवासी क्षेत्रे खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, २२ जून रोजी द्रास येथे 'सरहद्द शौर्यथॉन-२०२५' या स्पर्धेला झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद्द संस्था, पुणे तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मराठी चित्रपट हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते जागतिक स्तरावर प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या आंतरराष्ट्रीय यशामागे काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा वाटा आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिजित घोलप, जे अमेरिकेत मराठी चित्रपटांचं यशस्वी प्रक्षेपण करतात
(BSF Jawans Train Controversy) जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेदरम्यान त्रिपुराहून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना तैनात करण्यासाठी जीर्ण अवस्थेतील खराब ट्रेन पाठवल्याप्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ११ जूनला चार रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
"सीमा सुरक्षा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा!” पाच वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले हे विधान भारताच्या सीमा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल दर्शविते. अगदी साधे वाटणारे हे विधान प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सीमा व्यवस्थापन किंवा सुरक्षेबद्दल व्यापक आणि धोरणात्मक परिवर्तनाचे प्रतीक म्हणावे लागेल. हा नवा दृष्टिकोन सीमांना केवळ ‘बफर झोन’ म्हणून पाहत नाही, तर त्यांना भारताच्या सार्वभौमत्वाचे पहिले ध्वजस्तंभ मानतो.
बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याने तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिल्याने जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत 238 गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, सुमारे 24 लाखांच्या मुद्देमालासह तस्करांनी टोळी जेरबंद करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या लोकांची भेट घेतली आणि बाधित कुटुंबांना रोजगार नियुक्ती पत्रे दिली. त्याचवेळी रक्त आणि पाणी एकाचवेळी वाहू शकत नसल्याचा इशाराहील त्यांनी पाकिस्तानला दिला.
भारत सरकारने 'ऑपरेशन शील्ड' अंतर्गत २९ मे २०२५ रोजी सीमावर्ती राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचे नियोजित केले होते. काही प्रशासकीय कारणांमुळे ही ड्रिल राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि चंदीगड येथे पुढे ढकलण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक सामान्य लोक जखमी झाले किंवा त्यांचं नुकसान झालं. याच लोकांसाठी भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.
( Chinese in Indian maritime borders ) भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान चीनच्यादेखील कुरापती सुरू झाल्या आहेत. चीनचे हेरगिरी करणारे जहाज भारताच्या समुद्री हद्दीत आढळले आहे. यानंतर भारतीय नौदल कारवाईत उतरले असून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
( indian navy Shoot-to-kill orders ) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील किनारपट्टीलगत गस्त वाढवण्यात आली आहे.
Wakf Board scolds Orders to demolish illegal mosque गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशच्या शिमलामधील संजौली मशिदीच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली होती. त्या घटनेनंतर न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आणि चौकशीस प्रारंभ केला. या सर्व चौकशीमध्ये हिमाचल प्रदेश ‘वक्फ बोर्ड’ पूर्णपणे तोंडघशी पडले असून, हा वाद सहा आठवड्यांच्या आत सोडवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
द्रास उच्च न्यायालयाचा बनावट आदेशाचा दाखला देत तमिळनाडूतील दिवाणी न्यायालयाचा निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
(Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. २३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिका-यांचा समावेश आहे. याच चार दिवसांच्या काळात ८५० भारतीय नागरिक पाकिस्ता
अट्टारी बॉर्डरवरून एक धक्कादायक घटना समोर आली. एका भारतीय महिलेने बॉर्डरवरच स्वतःला विष पिऊन संपवण्याची धमकी दिली.
Supreme Court orders Governor सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना कालमर्यादेत निर्णय देण्याचा आदेश द्यावा, हा क्रूर विनोदच. पण, केवळ मोदी सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनीच विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यास विलंब लावला आहे, असे नाही. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने बनविलेल्या दहशतवादविरोधी कायद्याला तत्कालीन काँग्रेसच्या राज्यपालांनीही वर्षभरापेक्षा अधिक काळ मंजुरी दिली नव्हतीच.
(order of 297 e-buses ) २९७ इलेक्ट्रीक बसेस राज्य परिवहन महामंडळाने थेट विकत घेण्याची ऑर्डर हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (HRTC) कडून नोंदवण्यात आली आहे. निवीदा प्रक्रियेनंतर ह्या बसेस पुरवण्याची जबाबदारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला देण्यात आली आहे त्या सदर्भातील एलओए कंपनीला देण्यात आले आहे.
Mamata Banerjee यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे.
Bangladeshi Thieve arrested छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी बांगलादेशी चोरी करणाऱ्यांना दोन चोरांना अटक केली आहे. शिवाय एका मानवी तस्कर आणि आणखी एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे, चोरट्यांच्या टोळीतील असणारे चोर बांगलादेशी रहिवासी आहेत. तर उर्वरित दोन आरोपी प. बंगालचे रहिवासी आहेत. आरोपीने महासमुंद जिल्ह्यात नऊ वेळा चोऱ्या केल्या होत्या. यासाठी त्याने १० वेळा बांगलादेश-भारत सीमा ओलांडली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ लाख ५२ रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त
Rohingyas मेघालय आणि त्रिपुरा सीमावर्ती गावांमध्ये सात बांगलादेशी नागरिक आणि चार रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. सीमेपलीकडून परदेशी नागरिकांना भारतात अवैधपणे घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या चार भारतीय दलांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. ही घटना १६ मार्च २०२५ रोजी घडली आहे.
India-Bangladesh border त्रिपुराच्या सिपाहिजला जिल्ह्यात सुमारे २०-२५ बांगलादेशी तस्करांनी भारत-बांगलादेश सीमेकडून प्रवेश केला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली. संबंधित तस्करांनी भारतीय गुन्हेगारांसोबत मिळून मिसळून घुसखोरी केली होती. सायंकाळी ७. ३० वाजण्याच्या दरम्यान, बीएसएफच्या तैनात असलेल्या पथकाने त्यांना अडवले. इशारा असूनही तस्करांनी सैनिकांवर हल्ला केला. बीएसएफ जवान गंभीर जखमी झाला, त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Indo-Bangladesh Border एका आकडेवारीनुसार, तब्बल पाच ते सहा कोटी बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे. त्यामुळे भारत-बांगलादेशच्या सीमासुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने सीमेसुरक्षेतील आव्हाने आणि उपाययोजना यांचा केलेला हा उहापोह...
Bangladesh Border भारत-बांगलादेशच्या सीमेवर (Bangladesh Border) असलेल्या सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी बांगलादेशला अवैध तळघर बांधण्यासाठी विरोध केला आहे. यावेळी सीमा रक्षक बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ३१ जानेवारी रोजी बीएसएफच्या जवानांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला. त्याआधी उत्तर बंगालच्या सीमेवर दहग्राह अंगरपोटा भागामध्ये तळघर बांधले जात होते.
गुजरात राज्यातील जेरंबद बिबटे नर्मदा नदीमधून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि. १८ जानेवारी रोजी स्थांनिकांनी समोर आणला होता (gujarat releasing leopards in maharashtra border). नंदुरबार वन विभागाने या प्रकरणाच्या केलेल्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे (gujarat releasing leopards in maharashtra border). महाराष्ट्र सरकारच्या सरदार सरोवर प्रकल्पातील बार्जचा वापर करुन गुजरातचे वनकर्मचारी महाराष्ट्रात बिबटे सोडत असल्याचे उघड झाले आह
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ‘सागरी सीमा मंचा’तर्फे वेसावे (वर्सोवा) ते धाकटी डहाणू अशी उत्तरेकडील किनारपट्टीवरील किल्ले, जलदुर्ग व बेटांवर परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. दि. ९ ते दि. १२ जानेवारी या कालावधीत ही परिक्रमा ( Ocean Tour ) यशस्वीरित्या पार पडली. या परिक्रमेचा मागोवा या लेखात घेतला आहे.
(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी मेलबर्न येथील पराभवाचे पडसाद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उमटल्याच्या चर्चा होत्या. मेलबर्न पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत होते. परंतु गंभीरने ड्रेसिंग रुममधील या
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान करत वादाला तोंड फोडला आहे. या वेळेस भारतीय सैन्यदलाला लक्ष्य करत ममता दिदी म्हणाल्या की भारतात येणारे बांगलादेशी घुसखोर हे सुरक्षा दलातील सैनिकांमुळे भारतात प्रवेश करतात असे वादग्रस्त विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्याच बरोबर, इस्लामपुर, सिताई, चोपरा या गावांतून गुंड पाठवून केंद्र सरकारचा पश्चिम बंगाल अस्थिर करण्याचा डाव असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा पाचव्या कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे बोलले जात आ
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येत असून चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी भारताचा पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळविल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य देण्यात आले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर अल-अहमद अल- जाबेर अल साबह यांच्याकडून 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारत आणि कुवेत यांच्यातील संबंध दृढ केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. कुवेतच्या बयान पॅलेस मध्ये २२ डिसेंबर रोजी हा सन्मान सोहळा पार पडला.
गांधीनगर : गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील मसाली हे गाव ( Solar Village ) सीमावर्ती भागातील सर्वात पहिले 'सौर गाव' ठरले आहे. एकूण ८०० लोकसंख्या असलेले हे मसाली गाव पाकिस्तान सीमेपासून निव्वळ ४० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. मसाली या गावाने १०० टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव म्हणून आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.
(Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या बेळगावात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत संबंधित परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण
मुंबई : “भारतात स्वातंत्र्याच्या काळापासून सहकार ( Cooperative ) चळवळीची भूमिका महत्त्वाची आहे. सद्यस्थितीत सहकाराची सीमा केवळ भारत नाही, तर संपूर्ण विश्व असायला हवी आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. पृथ्वीचा ढासळत चाललेला समतोल वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘सहकार भारती’चे आठवे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर येथे होत आहे. त्यावेळी अधिवेशनाच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते.
बांगलादेशी बॉर्डर गार्डिंग फोर्स (BGB) च्या काही सैनिकांनी आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवर असणाऱ्या एका हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम थांबवल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. नमाजानंतर मंदिर पाहणे हे 'हराम' असल्याचे कारण देत मंदिराचे काम बंद पाडले. या अश्या कृत्यामुळे बांगलादेशी सरकारने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन तर केलेच. परंतु यामुळे युनुस सरकारच्या हिंदूंविरोधी असणारा इस्लामिक कट्टरतावादाचा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
तुम्ही एकवेळ तुमचे मित्र बदलू शकता, परंतु आपले शेजारी बदलता येत नाहीत,” असे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. हीच स्थिती भारतालाही लागू होते. भारताला असे शेजारी आहेत, ज्यांच्यासोबत संबंध नेहमीच कधी कठोर, कधी मधुर असे राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चीन आणि भारत यांच्यामध्ये सीमावाद सुरू होता. अनेक चर्चेच्या फेर्या पार पडूनही, यावर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. मात्र, ‘ब्रिक्स’ संमेलनापूर्वीच सीमेवर पेट्रोलिंग करण्याबाबतच्या विषयावर, भारत-चीनमध्ये सहमती झाली. ज्यातून चर्चेची
LAC पेट्रोलिंग संदर्भात चीनशी सैन्याचा करार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग भेट यामुळे द्वीपक्षीय संबंध सुधारणार का? आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांचे विश्लेषण
Narendra Modi पंजाब आणि राजस्थानला जोडलेल्या सीमावर्ती भागात २२८० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाला मोदी सरकारने हिरवा कंदील दिला. याप्रकल्पाचे काम सुरू होणार असून त्यासाठी ४४०० कोटींहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील रस्ते व्यवस्था सुधारण्याचा अनेक दिवसांपासून विचार सुरू होतो आता तो सत्यात येणार आहे.
आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत देशावर आधारित अनेक चित्रपट आले. पण त्यापैकी बॉर्डर हा चि६पट आजही आवर्जून पाहिला जातो. देशप्रेमाची भावना जागवणारा ९०च्या दशकातील अजरामर चित्रपट 'बॉर्डर'. १९९७ साली प्रदर्शित झाला होता.ज्यात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट होती. आता तब्बल २७ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकतीच 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली आहे.
भारत सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’चे सर्वोच्च अधिकारी ‘डायरेक्ट जनरल बीएसएफ’ आणि त्यांचे ‘सेकंड इन कमांड’ यांना त्यांच्या पदावरून नुकतेच हटविले आहे. असे इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडले आणि याचे मुख्य कारण आहे की काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ना पाकिस्तानकडून होत असलेली दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्यामध्ये आलेले अपयश. त्यामुळे जम्मू-उधमपूर भागामध्ये दहशतवाद्यांचा हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याची कारणमीमांसा आणि उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख...
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरघोडी आणि सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. त्यातच बांगलादेशात सत्तापालटाने अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच, पाकिस्तानने सीमेवर नापाक हालचाली सुरू केल्याने तणाव वाढला आहे. भारतीय सैन्याचे प्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी याबाबत माहिती दिली. काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. महानगरपालिकेच्या वतीने तातडीने ही तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल दुःखद निधन झाले.
पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बुधवारी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला. उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला शंभू सीमेवरील बॅरिकेड्स आठवडाभरात उघडण्याचे आदेश दिले आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी हरियाणा आणि पंजाब या दोन्ही सरकारांची असेल, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. आंदोलक शेतकरी प्रशासनाने ठरवलेल्या ठिकाणी आंदोलन करू शकतात.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवणे याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही एका प्रकल्पावर काम करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह यांनी राफाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रितीका यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून राफाला पाठिंबा दर्शवला, ज्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. लोक त्यांना विचारत आहेत की त्यांनी कधी त्या काश्मिरी हिंदूंबद्दल चिंता व्यक्त केली आहे ज्यांना त्यांच्याच देशात पळून जाण्यास भाग पाडले गेले, कत्तल केले गेले आणि त्यांच्यावर बलात्कार झाला.
"काँग्रेसचे सरकार आल्यास वाघा बॉर्डर उघडू" असे वादग्रस्त वक्तव्य पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांनी केले आहे. शनिवार, दि. २५ मे २०२४ ला पत्रकार परिषदेत चन्नी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
बहुतांशी राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. या जाहीरनाम्यांवरुन एखाद्या पक्षाच्या ध्येय-धोरणात राष्ट्रीय सुरक्षेला किती स्थान आहे, त्याची संपूर्ण कल्पना यावी. कारण, राष्ट्रसुरक्षेचा मुद्दा हा कुठल्याही पक्षासाठी प्राधान्याचाच असणे अपेक्षित. तेव्हा, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमधील राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या मुद्द्यांचा केलेला हा उहापोह...
लोकसभा निवडणुकीदरम्यान, महाराजगंज जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयितांना अटक करून त्यांना एटीएसच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन पाकिस्तानी आणि एक जम्मू-काश्मीरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून पाकिस्तानी पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.
भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा उच्चस्तरीय लष्करी चर्चा झाली. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) झालेल्या लष्करी चर्चेत भारत आणि चीनने अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.
अनेक स्त्रियांकडून एक प्रश्न सारखा आम्हाला विचारला जातो की, गरोदरपणात होमियोपॅथीची औषधे ही सुरक्षित असतात का? तर याचे जोरदार उत्तर म्हणजे होय, ही औषधे सुरक्षित असतात. गरोदरपणात स्त्रियांना मळमळ, उलट्या, अपचनाचा त्रास, बद्धकोष्टता, विविध प्रकारच्या अॅलर्जी, निद्रानाश किंवा झोपेचे विकार मानसिक तणाव यांसारख्या अनेक लक्षणांना सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त रक्तदाबाचे विकार, मधुमेह, थायरॉईड व श्वसनाचे विकार हेसुद्धा गरोदरपणात काही स्त्रियांमध्ये दिसून येतात. याशिवाय बाळाची वाढ नीट व सुयोग्य पद्धतीने होणेसुद
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील 108 मदरशांमध्ये विदेशी निधीचा पुरावा सापडला आहे. शिक्षणाच्या नावाखाली या मदरशांना आखाती देशांकडून सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे उघड झाले आहे. हा पैसा कुठे खर्च झाला याचा तपास उत्तर प्रदेश एसआयटी करत आहे. यूपी सरकारने मदरशांना दिल्या जाणाऱ्या निधीची चौकशी करण्यासाठी एडीजी मोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली. अहवालानुसार, एसआयटीच्या तपासात 108 मदरशांना परदेशी निधी दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. या मदरशांकडून त्यांच्या बँक