"बांगलादेशी घुसखोर तुमच्यामुळे..." ममता बॅनर्जी यांनी केला भारतीय सैन्यदलाचा अपमान!

    02-Jan-2025
Total Views | 62

mamta
 
कोलकाता : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान करत वादाला तोंड फोडला आहे. या वेळेस भारतीय सैन्यदलाला लक्ष्य करत ममता दिदी म्हणाल्या की भारतात येणारे बांगलादेशी घुसखोर हे सुरक्षा दलातील सैनिकांमुळे भारतात प्रवेश करतात असे वादग्रस्त विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्याच बरोबर, इस्लामपुर, सिताई, चोपरा या गावांतून गुंड पाठवून केंद्र सरकारचा पश्चिम बंगाल अस्थिर करण्याचा डाव असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.

शेख हसिना यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर, भारताच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात हालचाल बघायला मिळाली. यावरच नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल रात्रंदिवस खडा पहारा देत आहे. आणि यांच्याच कार्याचा अपमान केला जातोय. सोबत ममता बॅनर्जी यांनी जिल्हा प्रशासनावर सुद्धा ताशेरे ओढले आहेत. आपल्या पक्षासाठी बचावात्मक पवित्रा घेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की सुरक्षा दलातील लोकं महिलांवर अत्याचार करतात. सीमावर्ती भागाचे रक्षण करणे हे त्यांचे काम आहे, तृणमूल काँग्रेसचे नाही. जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना घुसखोरांचे येणं जाणं ठाऊक असतं. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की त्या केंद्र सरकारला निषेध पत्र लिहणार असून, सदर गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यायला लावणार आहेत.

 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121