बीएसएफने बांगलादेश सीमा दलाला सीमेवर तळघर बांधण्यापासून रोखले

    01-Feb-2025
Total Views | 94

Bangladesh Border
 
कोलकाता : भारत-बांगलादेशच्या सीमेवर (Bangladesh Border) असलेल्या सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी बांगलादेशला अवैध तळघर बांधण्यासाठी विरोध दर्शवला आहे. यावेळी सीमा रक्षक बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ३१ जानेवारी रोजी बीएसएफच्या जवानांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला. त्याआधी उत्तर बंगालच्या सीमेवर दहग्राह अंगरपोटा भागामध्ये तळघर बांधले जात होते.
 
याप्रकरणी एका वृत्तानुसार, बीएसएफ जवानांनी स्थानिकांना तटरक्षकांनी १५० मीटर आत बांधकाम करण्यापासून रोखले. बांगलादेशच्या आक्षेपानंतर सीमा तटरक्षकाने भारत-बांगलादेश सीमेवरील असलेले तटरक्षण आणि संबंधित प्रकरणाची मोहिम यापूर्वीच थांबवली होती. दोन्ही देशांमधील निर्माण झालेली तणावजन्य परिस्थिती टाळण्यासाठी ते थांबवण्यात आले होते.
 
शेख हसीना यांना बांगलादेशातून हटवल्यानंतर नोबेल पुरस्काराने नावाजण्यात आलेले पुरस्कर्ते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून बांगलादेशी हिंदूंवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे. यामुळे बांगलादेश-भारताच्या सीमेवर तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
उल्लेखनीय म्हणजे, धर्मनिरपेक्ष शेख हसीनाला हटवल्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील इस्लामी सरकार सत्तेत आल्यापासून भारत-बांगलादेश सीमेवर तणाव वाढला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121