"आमचे सरकार आल्यास पाकिस्तानसोबतच्या सीमा उघडू"- काँग्रेस नेत्याचे आश्वासन

    26-May-2024
Total Views | 107
 channi
 
चंदीगढ : "काँग्रेसचे सरकार आल्यास वाघा बॉर्डर उघडू" असे वादग्रस्त वक्तव्य पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांनी केले आहे. शनिवार, दि. २५ मे २०२४ ला पत्रकार परिषदेत चन्नी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
 
पत्रकार परिषदेत बोलताना चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली फ्लॉप ठरल्याचा दावा केला. आठ जिल्ह्यांतून लोकांना बोलावण्यात आले, पण तरीही दोन ते अडीच हजार लोकच जमू शकले. पंजाबमध्ये भाजपची स्थिती काय आहे आणि लोक त्यांना किती मते देतील हे यावरून दिसून येते, असे वक्तव्य चन्नी यांनी केले.
  
पंतप्रधानांच्या रॅलीवर टीका करण्याबरोबरच चन्नी यांनी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यामध्ये चन्नी यांनी घोषणा केली की, देशात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पंजाबची वाघा बॉर्डर खुली करू. जेणेकरून पाकिस्तानातील लोकांना उपचारासाठी पंजाबमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतील. यामुळे जालंधरमधील वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळेल.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121