भारत – चीनदरम्यान २१ व्या फेरीची चर्चा

    21-Feb-2024
Total Views |
India and China hold fresh round of military talks

नवी दिल्ली : 
भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा उच्चस्तरीय लष्करी चर्चा झाली. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) झालेल्या लष्करी चर्चेत भारत आणि चीनने अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.

दोन्ही देशांमध्ये सोमवारी उच्चस्तरीय लष्करी चर्चेदरम्यान भारत आणि चीनने एलएसीजवळील भागात शांतता राखण्यावर भर दिला. अर्थात, झालेल्या चर्चेने साडेतीन वर्षांहून अधिक काळ रखडलेले अनेक मुद्दे सोडवण्यासाठी कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी या विषयावर आपली मते मांडली. सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी लष्करी आणि मुत्सद्दी मार्गाने संवाद सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. याशिवाय सीमावर्ती भागातील जमिनीवर शांतता राखण्याची वचनबद्धताही त्यांनी व्यक्त केली.