शहरातील गुलराज टॉवर ते वडोलगाव रस्त्याचे काम पुर्ण न होता ठेकेदाराला एक कोटी बिल अदा केले म्हणुन शहर अभियंता संदिप जाधव यांच्यावर कारवाई करावी या मागणी साठी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सविता तोरणे , गजानन शेळके , समाजसेवक शिवाजी रगडे व फिरोज खान हे आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी नगरसेवक महादेव सोनवणे भगवान मोहिते दशरथ चौधरी रामेश्वर गवई यांच्या हस्ते बुधवारी सकाळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे.
Read More
(Four Children Killed in Pakistani Drone Strike in North Waziristan) पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली गावात सोमवारी २० मे रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर दोन महिन्यांच्या बाळासह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
(Air Marshal A. K. Bharti detail response to Pakistan aggression) भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या डीजीएमओ यांनी आज १२ मे रोजी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात असल्याचे म्हटले आहे. एअर मार्शल ए.के. भारती म्हणतात, "भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात आहे.
( India strike on six major Pakistani military bases ) विशेष प्रतिनिधी पाकिस्तानतर्फे भारतीय शहरांसह सैन्यतळांन लक्ष्य करण्याचा प्रयत्न मोडून काढल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकचे सहा सैन्यतळ, एक सैन्. विमानतळ आणि एका रडारतळावर लढाऊ विमानांसह अन्य शस्त्रास्त्रांनी हल्ला करून धडा शिकवला आहे.
( Operation Sindoor ) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचे आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला भारताने उद्धवस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण ‘टीम इंडीया’ने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला चकवा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडत पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले
(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आ
(Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत उद्धवस्त केले आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराकडून ५ महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा खात्मा केला आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे.
(India banned imports from Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
( Mumbai tanker drivers strike ) गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या टँकरचालकांच्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या शिष्टाईनंतर सोमवार, दि. 14 एप्रिल रोजी ‘मुंबई वॉटर टँकर असोसिएशन’च्या पदाधिकार्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.
(Mahadev Munde Case) महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा, हत्येच्या कटात ज्यांनी फोन केलेत त्या आरोपींचे सीडीआर काढावे तसेच महादेव मुंडेंच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या ३ प्रमुख मागण्यांसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. मात्र, बांगलादेशची परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. मोहम्मद युनूस स्वतः बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्रात ‘नोबेल’ पारितोषिक विजेते असतानाही, त्यांना आता बांगलादेश सांभाळणे कठीण जात आहे. बांगलादेशातील रेल्वे कर्मचारी संपावर गेल्याने येथील रेल्वे व्यवस्था ठप्प झाली असून, देशभरातील रेल्वेगाड्या बंद असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे हे, तर दुसरीकडे युनूस सरकारच्या विरोध
रेवडी वाटपाचा बादशहा’ असलेल्या ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवालांनी ( Arvind Kejriwal ) नवीन योजनेची घोषणा करीत दिल्लीच्या सरकारी तिजोरीवरच जणू ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. कालच केजरीवालांनी मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथींसाठी ‘पुजारी ग्रंथी सन्मान योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारांमधील ग्रंथींना मासिक १८ हजार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एवढेच नाही तर आजपासून म्हणजेच दि. ३१ डिसेंबरपासून या योजनेसाठीची नोंदणीदेखील सुरु होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ‘आप’
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला असून राज्यभरात अनेक ठिकाणी बससेवा ठप्प झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार सकाळपासून हा संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, या संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये. सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. मंगळवारी सकाळपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असून राज्यभरातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. येत्या ९ ऑगस्टपासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संप पुकारला आहे. शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
घाटकोपर पूर्वेकडे विमानाच्या धडकेत जवळपास ३५ रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली (flamingo bird strike). वन विभागाने फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे (flamingo bird strike). प्रसंगी या घटनेसाठी कारणीभूत असलेले विमान काल रात्री मुंबई विमानतळावर उतरवल्याची माहिती मिळत आहे. (flamingo bird strike)
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान राज्यातील 13 मतदारसंघांत सोमवार, दि. 20 मे रोजी पार पडेल. तत्पूर्वी सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून मोदी सरकारविरोधी वातावरणनिर्मितीसाठी अफवांचे पेव फुटले आहे. तेव्हा, सुज्ञ मतदारांनी या अफवांना, खोट्या प्रपोगंडाला आणि नॅरेटिव्हला कदापि बळी न पडता, कोणत्याही परिस्थितीत मतदानाकडे पाठ फिरवू नये. मतदानातूनच राष्ट्राला सर्वोपरी बळकट करणारे सरकार आपण निवडून देणार आहोत, याचे कायम भान ठेवावे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने खरोखरच सर्जिकल स्ट्राईक केला की नाही, याविषयी शंका असल्याची टिप्पणी काँग्रेस नेते आणि तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे.
एअर इंडियाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा सुधारणा झाली आहे. कर्मचारी परतल्याने आता सेवा पूर्ववत झाली आहे.एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी सामूहिक 'सिक लिव्ह' (आजारी सुट्टी) घेतल्याने एअर इंडियाच्या व्यवस्थापनात गैरसोय होऊन अनेक विमाने रद्द झाली होती. ज्यामुळे प्रवाशांना गैरसोय होऊन १७० विमान रद्द करण्याच्या नाईलाजाने निर्णय एअर इंडियाला घ्यावा लागला होता.
सैन्याचा अपमान करणे हे काँग्रेसचे प्रारंभापासूनचे धोरण राहिले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकद्वारे शत्रूच्या घरात घुसून मारण्याचे सामर्थ्य भारताने दाखवून दिले आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजस्थान येथे केले.
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने, शेतकरी आंदोलनाने उद्योग, व्यापाराचे दररोज ५०० कोटी रूपये नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांनी उत्तर भारतात देशव्यापी शेतकरी आंदोलनाने व्यापार व रोजगाराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. हे नुकसान प्रति दिवशी ५०० कोटींच्या घरात असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.
इराणने पाकिस्तानमधील दहशतवादी मिसाईल आणि ड्रोनच्या मदतीने एअर स्ट्राईक केला आहे. १६-१७ जानेवारी २०२४ च्या रात्री बलुचिस्तानच्या एका भागात इराणने हा हल्ला केला होता. जैश-अल-अदल नावाच्या इस्लामिक दहशतवादी गटाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी इराणने पाकिस्तानमध्ये हा हल्ला केला.
अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्ट्रीक्स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन केलेल्या हेअर केअर, कलर,टेक्स्चर व स्टाइलसाठी प्रोफेशनल उत्पादक श्रेणीने प्रोफेशनल्सना कट, कलर व स्टाइलच्या क्षेत्रात सन्मानित करणारी स्पर्धा ' स्ट्रीक्स प्रोफेशनल टाइम्स इंडिया हेअर स्टाइल आयकॉन २०२३ ' च्या विजेत्यांची घोषणा केली. प्रोफेशनल्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही स्पर्धा केशभूषा उद्योगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा शोध घेते, ज्यांचे परीक्षण जोकिम रुस, योली टेन कॉपेल,विपुल चुडासामा,आणि सॅव्हियो जॉन परेरा यांसार
राज्यातील विविध समाजांनी आरक्षणासह विविध प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. मराठा-ओबीसी- धनगर समाजाने केलेल्या आऱक्षणाच्या मागणीसोबत आता ब्राह्मण समाजानेही आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उज्जवल भवितव्यासाठी आणि उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समाजातील प्रतिनिधींनी केली आहे. या मागण्यांसाठी आझाद मैदानावर तीन दिवसांपासून आमरण उपोषणाचे हत्यारदेखील समाजाकडून उपसण्यात आले आहे. त्यामुळे आता आणखी एका समाजाच्य
महाराष्ट्र टॅक्सी, रिक्षा, कॅब चालक, डिलीव्हरी संयुक्त कृती समितीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल - २ येथे गुरुवारी, १९ ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई एअरपोर्ट टॅक्सी रिक्षा युनियन, मुंबई टॅक्सी चालक मालक सेना, मुंबई टॅक्सी युनियन, भारतीय टॅक्सी चालक संघ,खालसा कॅब, उपनगर रिक्षा चालक संघ आणि अन्य कामगार संघटनांनी सहभाग घेतला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपूर गाठत ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या उपोषण स्थळाला भेट देत, लिंबू सरबत देत आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविले. ओबीसींच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना आश्वस्त केले.
तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्रीपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. केंद्रीय मंत्र्यांसह अनेकांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असतानाच उदयनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे कल्याण पूर्वेत साखळी उपोषण केले जात आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतलेल्या राज्य सरकारचा सुधारित शासकीय निर्णयही उपोषणकर्त्यांनी अमान्य केला आहे. शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत शिष्टमंडळ आणि त्यानंतर सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर शासनाकडून नवा प्रस्ताव मनोज जरांगे यांना पाठवण्यात आला होता. मात्र, हा निर्णय नाकारत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अविश्वास ठराव दाखल झाला, तेव्हाच तो संमत होणार नाही, हे स्पष्ट झालेले होते. ज्या मणिपूरवरून विरोधकांनी तो दाखल केला, त्या मणिपूरची वस्तुस्थिती मात्र यानिमित्ताने देशासमोर आली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे सरकार एकीकडे आणि केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून घराणेशाहीचे स्वार्थी राजकारण करणार्या विरोधकांचा चेहरा मात्र उघडा पडला.
उपोषणकर्त्या सौ प्रज्ञा खजूरकर आणि बेस्ट कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीचे शिष्टमंडळ समन्वयक यांची काल (7 ऑग.) रात्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मीटिंग झाली, आणि त्यात त्यांनी जाहीर केले की मी तुमच्या पुढील प्रमाणे सर्व मागण्या मान्य करत आहे. त्यानंतर आता बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. बेस्टच्या 19 आगारांमधील कंत्राटी कामगारांनी मिळून एक शिष्टमंडळ बनवलं होतं.
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांच्या पार्शवभूमीवर बुधवार दिनांक ४ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचा परिणाम थेट तिसऱ्या दिवशी देखील पाहण्यास मिळाला आहे. मुंबईतील अनेक बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहण्यास मिळाल्या. मुंबईतील एकूण २७पैकी १२ आगारांमधील भाडेतत्त्वावरील तब्बल एक हजार बस मागील तीन दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावल्या नसल्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईतील घाटकोपर डेपोमधील बेस्ट बसचे कंत्राटी चालक कालपासून संपावर गेले आहेत. विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे.
कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे उद्भवलेल्या धोक्यामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लेखक, कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञांनी संप पुकारला आहे. हा ६३ वर्षांतील सर्वात मोठा संप असल्याचे सांगितले जात आहे. तीन महिन्यांपूर्वी कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे उद्भवलेल्या धोक्यामुळे लेखकांनी काम बंद केले होते. आता त्यांच्या संपामध्ये हजारो चित्रपट आणि आणि मालिकांमधील कलाकारही सहभागी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सोमवार, २९ मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे भारताची प्रतिमा आणि नावलौकिक देशात आणि विदेशातही वाढला आहे. मोदींच्या रुपाने देशाला मिळालेला ‘नवम’चा मंत्री भारताला जागतिक महासत्तेकडे घेऊन जात आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम धोरणलकवाग्रस्त प्रशासनास नवी उमेद दिली. त्यानंतर सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आखून त्या यशस्वी करण्यावर भर द
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे गेल्या दोन महिन्यात १२० चिनी आयडी बंद करण्यात आले आहेत. याद्वारे खोट्या संदेशांच्या आधारे मालवेअर लिंक्स पाठविण्याचे षडयंत्रदेखील उध्वस्त करण्यात यश आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यांमध्ये अनाथ झालेल्या मुलींच्या संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी ‘अदिती सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था १९९९ पासून कार्यरत आहे, या संस्थेने सांभाळ केलेल्या जवळपास १०० मुलींची धैर्यशील माता असलेल्या पंकजादीदी. राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय घोष प्रमुख व प्रचारिका या किलांबी पंकजा वल्ली (पंकजादीदी) यांचा नुकताच ठाण्यात प्रवास झाला. दि. २३ मार्च रोजी गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता श्रीराम व्याख्यान शाळेच्या सभागृहात त्यांची प्रकट मुलाखत झाली. राधा भिडे यांनी त्यांची मुलाखत घेतल
सुशासनात संवेदनशीलता किती महत्त्वाची असते, तीदेखील आपल्या महाकाय लोकसंख्या असलेल्या भारतात, हे अलीकडील काळात अनेकदा सिद्ध झाले. भ्रष्टाचारमुक्त वर्तन आणि प्रामाणिक कार्यनिष्ठा असली की, हे सहज शक्य होतं. भारताच्या लोकशाही प्रक्रियेला यामुळे चकाकी येते, यात शंका नाही.
मोदींच्या काळात ना दहशतवादी हल्ले झाले, ना कोठे बॉम्बस्फोट झाले. ही जाणीव आज जशी भारतीयांना आहे, तशी जगातील इतर राष्ट्रांचे नेतृत्व करणारे नेतेदेखील मान्य करू लागल्याने आता ‘नो मनी फॉर टेरर’ अर्थात अतिरेक्यांसाठी पैसा नाही, याचे प्रमुख केंद्र भारतात निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाला अमलात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
बालाकोट परिसरातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते तळ उद्ध्वस्त करण्याची कामगिरी भारतीय लष्कराने केली. या कामगिरीचे कौतुक करण्याऐवजी काँग्रेससह विरोधकांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्या अशी मागणी केली ही मागणी आता काँग्रेसवर बुमरँग सारखी उलटली आहे.
डिजिटल युगात ’अल्गोरिदम’शिवाय कंपन्यांचे पान हलत नाही. अॅप्सचा वापर जरी मोफत असला तरीही ग्राहकांच्या डेटावर कंपन्या मालामाल होऊन जातात. ही गोष्ट आता ‘डिजिटल युझर्स’साठी नवी राहिलेली नाही. जेव्हा तुम्हाला उत्पादन मोफत मिळते, तेव्हा तुम्हीच त्या कंपनीसाठी उत्पादन असता, अशा आशयाची एक म्हण इंग्रजीत प्रचलित आहे. पण, भारताने डेटा सुरक्षेबाबत वेळीच किती व्यापकदृष्टीने विचार केला, याची प्रचिती अमेरिकन ’युनायटेड स्टेट्स फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’चे (एफसीसी) आयुक्त ब्रेंडन कॅर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून येईल.
ज्याचा शोध २१ वर्षे अमेरिका घेत होती, त्या ‘अल कायदा’च्या अयमान अल जवाहिरीला काबूलमध्ये ड्रोनद्वारे अमेरिकेने नुकतेच ठार मारले. अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचा बिनधास्तपणे भंग करून त्याला त्याच्या घरात घुसून अमेरिकेने त्याचा खात्मा केला. आपल्या तीन हजार नागरिकांना ‘९/११’च्या हल्ल्यात ठार करणार्या ‘अल कायदा’च्या प्रमुखाला संपवून अमेरिकेने प्रतिशोध शांत केला. जॉर्ज बुश यांच्यापासून जो बायडनपर्यंत नेते बदलत गेले. पण, अमेरिकेचे दहशतवादविरोधी धोरण मात्र तसेच वास्तववादी राहिलेले दिसून येते. ‘दहशतवाद्यांना त्यांच्
आज जवळपास सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऑडिओ बुक्स` अगदी सहज असतात. ज्ञानेश्वरी जशी ज्ञानेश्वरांनी स्वतः उलगडून म्हंटली तर ती ऐकण्यात जी मजा येईल ना, तशीच मजा सावरकरांच्या आवाजात त्यांच्या पुस्तकांचे विश्लेषण ऐकण्यात मिळाली असती. एक मात्र नक्की वाटतं, टीव्हीवर होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये सावरकरांनी भाग घेतला नसता. कारण, `क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे` या तत्त्वावर आयुष्यभर चालले होते सावरकर!
"सहा महिने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची हक्काची बँक असलेल्या एसटी बँक आणि तिची २००० कोटींची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आखला आहे" असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे
बेस्टच्या खासगी बसचालकांनी टाकला ‘काम बंद’चा गिअर