प्रवाशांची गैरसोय होईल असं कृत्य करू नये! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आवाहन

    03-Sep-2024
Total Views | 48
 
MSRTC
 
मुंबई : सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक परिपत्रक जारी करत कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आवाहन केले आहे. "उद्या दि. ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर कामगार संघटनांच्या कृती समितीला बैठकीकरिता बोलवले आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचारी बंधू-भगिनींनी ऐन सणासुदींच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशी कोणतीही कृती करू नये," असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे.
 
हे वाचलंत का? -  एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये! सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू; मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन
 
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आवाहन केले आहे. सकारात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. एसटीच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कर्मचारी आपला संप मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121