Poultry

राज ठाकरेंनी राऊतांना झाप झाप झापलं!, "महाराष्ट्राची भाषा घाण करणारा भिकार संपादक" म्हणत टीका!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भांडूपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी आपल्या नियमित पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलणार, असा जोरदार पलटवार केला आहे.

Read More

बदलापूरच्या घटनेमुळे राज ठाकरे पोलीसांवर संतापले! "हा कुठला..."

पोलीसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्र सैनिकांनाही या प्रकरणात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले की, "बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?", असा सवाल त्यांनी उपस्थित क

Read More

अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यात काय घडलं?

विधानसभा निवडणूकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. साहाजिकच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी कंबर कसलीये. मात्र, राज्यातील वातावरण सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलंय. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला आणि या हल्लानंतर दोन्ही पक्षांमध्ये पेटलेलं राजकारण. होय.. मनसे पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरीच्या गाडीवर हल्ला केला. एवढंच नाही तर या राड्यात एका मनसैनिकाचा जीवही गेला. पण हा हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय? अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये काय घडलं? आ

Read More

मुंबई-गोवा महामार्ग, मराठीला अभिजात दर्जा यांसह राज ठाकरेंच्या मोदींकडून सहा अपेक्षा!

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यादा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी, असा उल्लेख करत राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तीन टप्प्यात मी बोलणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक यांसारख्या महत्त्वकांशी निर्णयाचे स्वागत केले. राम मंदिर झाल्यानंतर शरयू नदीत फेकून दिलेल्या कारसेवकांच्या मृतात्म्याला शांती मिळाली. तिहेरी तलाक रद्द करत मुस्लीम भगिनींना न्याय दिला. याच प्रकारे कलम ३७० हटवून तो भाग मोदींनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे अधोरेख

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121