( 287th Vasai Vijayotsav Din ) वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
Read More
(Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
विरार, दि. 24 : प्रतिनिधी खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
स्वामी नरेंद्राचार्य संस्थान वसई येथे ५०६ धर्मांतरित कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाड येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल हिंदू समाजातून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले
( Overhead power lines in Vasai-Virar Municipal Corporation area will be buried in the next 2 years ) वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात टप्प्या-टप्प्याने भुमिगत करणार अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदार राजन नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना दिली. वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड वायरर्स असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे ओव्हरहेड वायरर्सवर पडून वीज वारंवार खंडित होते. यामुळे या वायरर्
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून तेथील हा भाग झोपडपट्टीमुक्त व्हावा याकरिता वसई-विरार महानगपालिका परिसरात मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून गुरुवार, दि.२८ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई पाठोपाठ महानगरातील शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशातून आता वसई-विरारमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वसईतील गोगटे मिठागर परिसरात शिकारी पक्ष्यांमधील घार आणि गरुड प्रजातीचे अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहेत (gogate saltpan vasai). मिठागर परिसरात पक्षी निरीक्षणाकरिता गेलेल्या मुंबईतील पक्षीनिरीक्षकांनी मृत पक्ष्यांचे निरीक्षण नोंदवले आहे (gogate saltpan vasai). त्यामुळे या पक्ष्यांचा मृत्यू संसर्गासारख्या कोणत्या कारणामुळे झाला आहे का, याची पडताळणी करणे आवश्यक आहे. (gogate saltpan vasai)
कल्याण : भारतीय जनता पक्षातर्फे आगामी काळात संपूर्ण भारतभर सदस्य ‘नोंदणी अभियान’ ( BJP Members ) राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये वसई-विरार जिल्ह्यातून किमान पाच लाख सदस्य नोंदणीचे करण्याचे आवाहन भाजपच्या संघटन पर्व २०२४ सदस्य नोंदणी मोहिमेचे प्रदेश सहसंयोजक, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा येथे झालेल्या वसई-विरार जिल्ह्याच्या प्राथमिक बैठकीत त्यांनी पाच लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य निर्धारित केले.
खानिवडे : वसईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ८११ हेक्टर जागेत कांदळवन ( Kandalwan ) क्षेत्र आढळून आले आहे. हे क्षेत्र आता कांदळवन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या भागाची खातरजमा करून कांदळवन ताब्यात घेतले जाणार आहे. कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रात वसई रोड येथे नवीन बाह्य टर्मिनसची योजना आखली आहे. वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसद्वारे हाताळल्या जाणाऱ्या बाहेरच्या गाड्यांचा भार कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. अखेर वसई रेल्वे टर्मिनलची मागणी मान्य करण्यात आली आहे, ही घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
ठाणे : नालासोपारा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक व वसईच्या ( Vasai ) आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांची भेट घेतली.
वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर पराभूत झाले असून भाजपच्या स्नेहा दुबे पंडित विजयी झाल्या आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना आपल्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. मळणीयंत्रात केस अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. गुरुवार दि. १४ नोव्हेंबर या दिवशी सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे. मका मशीनमध्ये मका टाकत असताना अचानक त्या मशीनमध्ये डोक्याचे केस अडकले यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या, आणि त्यांचे शिर धडावेगळे झाले. कोकिळाबाई संजय गवळी ( Kokilabai gawli ) असे या मृत महिलेचे नाव आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूम
वसईमध्ये एका प्रियकराने भर रस्त्यात आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना गंभीर असून असून या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे सावरकरांना दूषणे देणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी सर्वांनी सावरकर वाचून त्यांना समजून घ्यावे, असे आवाहन सावरकर अभ्यासक अक्षता देशपांडे यांनी केले. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘कालजयी सावरकर’ विशेषांक प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान वसईतील समाज उन्नती मंडळ सभागृह, माणिकपूर येथे मंगळवार, दि. २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न झाला. यावेळी सावरकर अभ्यासक अक्षता देशपांडे यांचे स्वातंत्र्यव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेतील शाश्वत विकास हाच मास्टर प्लॅन आहे. आणि हाच प्लॅन घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहोत, असे पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी म्हटले आहे. पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ. सवरा यांचा काय मास्टर प्लॅन आहे, हे जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ चे प्रतिनिधी सुप्रिम मस्कर यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
वसई किल्ल्यात मागील पंचवीस दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला मंगळवार दि. २३ मार्च रोजी पहाटे जेरबंद करण्यात आले (vasai fort leopard). वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या जेरबंद झाला. (vasai fort leopard)
वसईतील किनार्यांच्या भटकंतीत विविध जीवांचे छायाचित्रण करता-करता अनेक प्रजातींची नव्याने नोंद करणारे, ‘सिटीझन सायन्स’चे पुरस्कर्ते, छंदिष्ट छायाचित्रकार दत्ता पेडणेकर यांचा प्रवास...
महाराष्ट्रात हायड्राॅईड्स (Hydroid) या समुद्री जीवाच्या 'कॉरिमॉर्फा' कुळाचे ७१ वर्षांनी दर्शन झाले. वसई तालुक्यातील भुईगाव किनाऱ्यावर या जीवाचे दर्शन झाले असून राज्यातून १९५३ साली 'कॉरिमॉर्फा' कुळाची शेवटची नोंद करण्यात आली होती. हायड्राॅईड्स (Hydroid) या जीवावर राज्यात फार कमी अभ्यास झाला असून यानिमित्ताने या जीवाच्या प्रजातींवर अभ्यास करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Hydroid)
भारतामधून प्रथमच 'कोस्टासिएला पॅलिडा' या समुद्री गोगलगायीच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे ( Costasiella pallida sea slug ). वसई तालुक्यातील दलदलीच्या किनाऱ्यावर ही प्रजात आढळली आहे ( Costasiella pallida sea slug ). वसईत सागरी जीवांचे निरीक्षण करणाऱ्या पेडणेकर कुटुंबीयांनी या प्रजातीची नोंद केली आहे. 'सिटिझन सायन्स' या संकल्पेनेअंतर्गत पेडणेकर कुटुंबीय वसईतील सागरी जैवविविधतेची नोंद करत आहेत. ( Costasiella pallida sea slug )
वसई तालुक्यात मंगळवार पासून सुरू झालेल्या माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. वसई-विरार शहरात भाद्रपद महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईजवळील मीरा रोड परिसरात दि.२१ जानेवारी रोजी रात्री उशिरा हल्लेखोरांनी गोंधळ घातला. ज्या वाहनांवर श्री राम नावाचे झेंडे लावण्यात आले होते त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. हल्लेखोरांनी केलेल्या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तोडफोड करताना हल्लेखोरांनी रस्त्यावर ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा दिल्याचे बोलले जात आहे. या गोंधळाचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. दरम्यान या घटनेबद्दल भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, 'काल रात्री मीरारोडमध्ये जे झाले. एक लक्षात ठेवा, चुन चुन के मारेंगे'
घरातली लाडकी अल्लड मुलगी जेव्हा मुख्याध्यापिका होते, तेव्हा आलेल्या जबाबदार्यांसोबत एक मराठी माध्यमाची संस्था टिकवण्यासाठी, एकाकी लढा देणारी पल्लवी चौधरी हिची यशोगाथा...
देशाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी वसई दौऱ्यावर येत आहेत. गडकरींच्या या दौऱ्याने वसई विरारच्या भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला आहे . गडकरींच्या या दौऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून वसई विरार मधील अनेक प्रलंबीत आणि नवीन विकास कामांची मागणी करण्यात येणार आहे .
वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक असा होता. पुढील काळात कृत्रिम बुध्दीमत्ताच जगावर अधिराज्य गाजविणार आहे. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता काम करणार आहे. कृत्रिमबुध्दीमत्तेचा सकारात्मक वापर फायदेशीर ठरणार असल्याचे मत परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता वसई पश्चिम येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात संपन्न झाला.
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार शहर महानगरपालिका आणि गोन्सालो गार्सिया महाविद्यालय,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकविसाव्या साहित्य जल्लोषच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. ६ ॲाक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वरचित काव्यस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोर्डी, डहाणू , चिंचणी, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, सफाळे तसेच वसई तालुक्यांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
भाषेच्या व्यवहाराचा जल्लोष करण्याचा सामर्थ साहित्यात आहे. त्याचा जल्लोष व्हायला हवा असे मत असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. वसईत आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष"या कार्यक्रमात ते बोलत होते. वसईत दि. ७ ऑक्टोबर रोजी आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" हा कार्यक्रम संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात साजरा झाला.
भाजपच्या वसई-विरार जिल्हा सचिवपदी अमित दुबेंची नियुक्ती झाली आहे. गेली अनेक वर्षे भाजपचा कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात काम करताना मला समाधान वाटते. माझी जिल्हा सचिव पदावर नियुक्ती केल्याबद्दल मी संपूर्ण भाजपा वसई विरार जिल्हा कार्यकारिणीचे मनःपूर्वक आभार मानतो. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन, असे अमित दुबे यांनी म्हटले.
"स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत आयोजित “एक तारीख एक तास" या मोहिमेत रविवारी १ ऑक्टोबर रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या अभियान अंतर्गत जीवदानी पायथा, कातकरी पाडा, मानवेल पाडा रोड, विराट नगर/ विरार बस डेपो, विरार महानगर पालिका (विरार पूर्व), अंबाडी रोड वसई वेस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन मा. खासदार राजेंद्रजी गावित, मा. प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या हस्ते झाले.
'कुपारी’ हे वसईजवळ राहणार्या एका समाजाचं नाव. वसईवर पोर्तुगिजांचा अंमल होता. तेव्हा या भागात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले व सर्वच समाजात ख्रिस्ती आणि हिंदू असे विभाजन झाले. ब्रिटिशांच्याही पूर्वी पोर्तुगीज राजवटीत हे धर्मांतर झाले असले, तरीही आपली सांस्कृतिक मूल्ये मात्र इथल्या समाजांनी जपली आहेत. यातलाच एक समाज म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. त्यांच्यातून धर्मांतरित झालेले ते सामवेदी ख्रिस्ती, यांना ’कुपारी’ असे म्हणतात. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही शहरीकरणाचा फारसा परिणाम यांच्यावर झाला नाही आ
वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिकेने “लेखा अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी” या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सबमिट करावयाचे आहेत.
वसईत गुरुवारी पहाटे पासून दमदार हजेरी लावलेल्या पावसाने करपणाऱ्या भातपिकांना जीवदान दिले असून हा पाऊस हळव्या पिकांना संजीवनी ठरला आहे. यामुळे आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोकुळ अष्टमी च्या दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वरूण राजाचे आभार मानले आहेत.
वसईच्या ग्रामीण भागात विरार पूर्वेकडील खार्डी कोशिंबे गावाच्या हद्दीतील तळ्याचापाडा परिसरात अज्ञात हिंस्त्र रानटी प्राण्याने दोन कुत्रे, एक मांजर व गायीचे वासरू फस्त केल्याचे आढळुन आले आहे . मागील पंधरा दिवसांपासून घडलेल्या या घटनेने परिसरातील राहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . तो प्राणी बिबट्याच असावा असे येथील जुने जाणते रहिवाशी सांगत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .त्यामुळे आता या भागातील जंगला शेजारी शेती असलेले शेतकरी संध्याकाळी लवकर घरी परतत आहेत .
आम्ही सारे, वसई आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय यांच्या वतीने कै . निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन दि . २० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकपात्री अभिनयासाठी ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच नाटुकली स्पर्धेसाठी २३ संघानी सहभाग घेतला होता. तरी एकपात्री अभिनयात प्रथम क्रमांक सानिका देवलकर, द्वितीय क्रमांक स्नेहा प्रसाद, तृतीय क्रमांक कृपा गायकवाड हिने मिळवले. तसेच मानसी जाधव, समीक्षा पाटील, उत्तरा बोस, विजया गुंडप यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक आणि विशेष लक्षव
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि आम्ही सारे, वसई यांच्यावतीने कै. निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष असून ही स्पर्धा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून होणार आहे. रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी जिमखाना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई (प.)येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत (८४४६४८०६४१) किंवा रोहन (९६६५१७०५
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबईतील रौप्य महोत्सवी अधिवनेशनानिमित्त वसईत आम्ही विद्यार्थी मेळावा आयोज्ति केला होता. त्या मेळाव्यास राष्ट्रीय संघटनमंत्री मदनदास देवी व प्रदेश सरचिटणीस माधव ठाकूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. तेजस्वी चेहरा व ओजस्वी भाषणाने त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली होती.
मुंबई शहरालगतच्या भागातदेखील मेट्रोचा विस्तार व्हावा, याकरिता राज्य शासनाकडून हालचाली सुरु असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईलगतच्या शहरात आता दळणवळणाच्या सुविधांचा विकास होणार असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना नवी मुंबई, उरणला जाण्यासाठी आता मेट्रोने प्रवास करता येणार आहे. तसेच, राज्य शासनाकडून प्रस्तावित असलेला मेट्रोचा कॉरिडॉर जेएनपीटी ते नायगावपर्यंत होता, त्याचा विस्तार विरारपर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे तानसा धरण तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्यांवर असलेल्या कचर्याच्या ढिगांमुळे आणि अस्वच्छतेमुळे व्यथित होऊन पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलणार्या वसईकन्या कीर्ती शेंडे यांचा हा प्रवास...
खानिवडे : वसईत गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्णता प्रचंड जाणवत असून वसई एक प्रकारे तापली आहे .या वर्षातील गर्मीचा पारा हा मागील बुधवारपासून सर्वोच्च ठरला असून कमाल ४०च्या पार पारा चढला होता . यामुळे उष्णतेचे चटके नागरिकांना बसू लागले आहेत. गुरुवारी पालघर मध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे आपले आरोग्य सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर उन्हाचा पारा असे हवामानात बदल निर्माण होत आहेत.
सामाजिक संस्थांना आर्थिकबाबतीत ‘आत्मनिर्भर’ करण्याचा मानस बाळगणारे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा तळागाळातील लोकांना व्हावा, यासाठी प्रयत्नरत डॉ. राहुल अनंत भांडारकर यांच्या समाजसेवेचा प्रवास...
“वसई जवळील तुंगारेश्वर पर्वतावरील 69 गुंठे जमीन बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास देण्याचा सकारात्मक विचार सरकार करेल,” असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या शिष्टमंडळास दिले.
‘विवेक व्यासपीठा’च्या ‘संस्कृती, संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान’च्यावतीने संस्कृत भाषेतील जागतिक स्तरावरील संस्कृत गुरुकुल ‘वेदिक हेरिटेज कॉन्क्लेव्ह’ वसईत साकारले जात असून मंगळवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या गुरुकुलाचा शुभारंभ एका शानदार कार्यक्रमाद्वारे करण्यात आला.
वसई-विरार महापालिका आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतीमधील एकूण ५० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे
ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहण्याची शक्यता आहे.
ठाणे शहराला लाभलेला ३२ किमी लांबीचा खाडी किनारा आणि रस्ते व अन्य प्रवासाच्या ताणावर जलवाहतुकीचा नवा पर्याय उभारण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप हे काम रेंगाळलेले असून आता कल्याण-डोंबिवली-ठाणे-वसई-भाईंदर ही जलवाहतूक दिवाळीपर्यंत सुरू होणार असल्याचे दावे लोकप्रतिनिधींकडूनकेले जात आहेत.
अॅड. परमानंद ओझा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ वसईतील रिक्षाचालकांनी एकत्र येत होर्डींग बसवले आहेत.