विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांचे महत्वपूर्ण निर्देश, म्हणाले...

    12-Jun-2025
Total Views | 90



गांधीनगर : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर संवाद साधला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह तातडीने गुजरातकडे रवाना झाले आहेत.

गुरुवार, ११ जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. दरम्यान, या अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी दिले आहेत.


मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल म्हणाले की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताची दुर्घटना दुःखदायक आहे. या अपघातात तातडीने बचाव आणि मदतकार्य हाती घेण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याचे आणि रुग्णालयात सर्व उपचारांची व्यवस्था प्राधान्याने करण्याचे निर्देशही मी दिले आहेत."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही माझ्याशी बोलून या विमान अपघातात बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ पथके आणि केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भुपेंद्र पटेल यांनी दिली. दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हेदेखील या विमानातून प्रवास करत होते.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121