नवा भारत कोणाला छेडत नाही; जो छेडेल त्याना सोडतही नाही - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

    24-May-2025
Total Views | 7

Yogi Adityanath on new india
 
मुंबई : "हा नवा भारत आहे. तो कोणाचीही छेड काढत नाही. मात्र जर कोणी छेडलेच तर तो त्यांना सोडतही नाही.", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवार, दि. २३ मे रोजी अयोध्येत आयोजित 'श्री हनुमान कथा मंडपम'च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अयोध्येचे पुनरुज्जीवन, महाकुंभ आणि भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरवरही चर्चा केली.
 
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, "पाकिस्तानने आपल्या निष्पाप लोकांवर हल्ला केला, त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. २६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. आता १२४ हून अधिक दहशतवादी मारले जात आहेत, त्यामुळे दोष भारताचा नाही तर पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा आहे, दहशतवादाला पोसणाऱ्यांचा आहे. जे एक दिवस पाकिस्तानला बुडवेल!"
 
पाकिस्तानचा अंत जवळ आलाय
 
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, पाकिस्तानकडे जास्त वेळ शिल्लक नाही. आपल्या एका पूजनीय संताने हे जाहीर केले होते, अध्यात्मिक जगात पाकिस्तानचे अस्तित्व नाही आणि ज्याचे खरे अस्तित्व नाही ते कृत्रिम आहे. कृत्रिमाचे आयुष्य निश्चित आहे. पाकिस्तान ७५ वर्षे खुप जगला, आता त्याचा अंत जवळ आलाय."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121