कर्जाचा डोंगर, नैराश्य आणि ...लेखक, दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या!
18-May-2025
Total Views | 12
नागपूर : मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी १७ मे रोजी नागपूरच्या रामकृष्ण मठात सायंकाळी ४:३० च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या भावाला भेटायाला नागपूर येते दाखल झाले होते. शनिवार सायंकाळी त्यांच्या आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर, सांस्कृतिक विश्वात एकच खळबळ उडाली. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
दिग्दर्शक आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे होते. पुण्याच्या एफटीआय येथून दिग्दर्शक म्हणून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपले नशीब आजमवण्यासाठी ते मुंबईत आले. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी साह्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर गजरा, अग्नी, एका श्वासाचे अंतर, किमयागार, चक्रव्यूह या मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले. गार्गी आणि आनंदाचे डोही या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांचा गार्गी हा सिनेमा काल्सबर्ग चित्रपट महोत्सवात प्रदर्शीत करण्यात आला होता. परंतु दुर्देवाने गार्गी आणि आनंदाचे डोही हे दोन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शीत होऊ शकले नाही. त्यांना चित्रपटसृष्टीतून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय कर्जाच्या ओझ्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत अडकले होते, ज्यामुळे त्यांनी हे टोकेचे पाऊल उचललं. यासंबंधी धंतोली पोलिस अधिकचा तपास करत आहेत.