देवेंद्र द्वेषाने ठाकरे आणि राऊत पछाडलेत

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची टीका

    01-Aug-2024
Total Views | 47

Thankre Rahut
 
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना राज्यात दुसरे काही दिसत नाही. देवेंद्र द्वेषाने राऊत आणि ठाकरे पछाडले आहेत, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आमदार दरेकर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना राज्यात दुसरे काही दिसत नाही.
 
राज्यातील प्रश्न, विकासावर ते बोलत नाही. देवेंद्र द्वेषाने संजय राऊत, उद्धव ठाकरे पछाडलेले आहेत. टोकाची, जनतेला उबग आलाय अशी वक्तव्य संजय राऊत, उद्धव ठाकरे करताहेत. त्यांना त्याचा राणाभीमदेवी थाट वाटत असेल परंतु जनतेच्या मनातून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी फडणवीसांवर व्यक्तिगत केलेल्या टिकेमुळे उतरले आहेत ही वस्तुस्थिती आहे. तसेच दळभद्री विचाराचा नेता असला की त्याला सगळे तसेच दिसते.
 
संजय राऊत दळभद्री विचाराचे झालेत ते रोज सकाळी गरळ ओकताना दिसतात, असा टोलाही दरेकरांनी राऊत यांना लगावला. दरेकर पुढे म्हणाले की, भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही ही आपल्यात म्हण आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही ते होते, मविआचे सरकार होते तेव्हाही ते होते, सत्तेतून यांना बाहेर काढले पुन्हा फडणवीसांनी सरकार बनवले, सरकारमध्येही राहिले. देवेंद्र फडणवीस कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार. उद्धव ठाकरेंना आपले अस्तित्व शोधावे लागेल. त्यांना जो गर्व आलाय तो महाराष्ट्रातील जनता निश्चितच उतरवेल, अशी टिकाही दरेकरांनी केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

पराभूत सैन्याचे

पराभूत सैन्याचे 'फिल्डमार्शल'; आधी हकालपट्टीची चर्चा, आता लष्कराच्या सर्वोच्च पदावर बढती

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121