“बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पडताना मी फक्त…”, त्या क्षणाच्या आठवणीत नेहा शितोळे भावूक

Total Views | 47

neha shitole 
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन २०१९ मध्ये आला होता. यात शिव ठाकरे आणि नेहा शितोळे या दोन स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पाऊल ठेवले होते. सीझन २ चा विजेता शिव ठाकरे झाला होता. त्यावेळी मनात नेमकं काय सुरु होतं याची कबूली नेहा शितोळे हिने दिली आहे. ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा’ या भागात तिने बिग बॉसच्या घरातील काही क्षण शेअर केले आहेत.
 
नेहा म्हणाली की, “बिग बॉसच्या घरातून ज्यावेळी बाहेर पडायचं असं लक्षात आलं आणि काही क्षणात मला घराचा दरवाजा ओलांडून बाहेर जायचं होतं, त्यावेळी मी फक्त त्या घराला डोळ्यात सामावून घेत होते. कारण, मला पुन्हा हे घर कधीच पाहायला मिळणार नव्हतं. त्याचं कारण असं की, एकदा का तो सीझन संपला की ते संपुर्ण घर जमीनदोस्त होतं. पुढच्या कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही बिग बॉसच्या घरात गेलात तरी तुमचं ते घर तुम्हाला पुन्हा दिसत नाही”.
 
पुढे नेहा म्हणाली की, “शिव ठाकरे जरी तो सीझन जिकला असला तरी माझ्यात आणि त्याच्यात केवळ बक्षीसाची रक्कम आणि ट्रॉफिचा फरक आहे. बिग बॉसच्या घरात त्याच्यापेक्षा अधिक काही क्षण मी जगले आहे कारण घरात आत मी त्याच्याआधी गेले होते. त्यामुळे ते घर खरचं तुम्हाला तुमचा स्वत:चा वेळ आणि स्वत:ला जाणून घेण्याची एक संधी देखील नक्कीच देतं”, अशी जुन्हा बिग बॉसच्या आठवणीत नेहा रमली.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख प्रविण दरेकर यांनी दिली...

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा विचार आपल्याला पदोपदी आढळून येतो. याच पारंपरिक विचारांचा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेसोबत मेळ साधत, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी भारतातील ४ विद्यापीठांनी एकत्र येऊन, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याच्या अंतर्गत भारतीय शिक्षणव्यवस्था, आयुर्वेद, योगा या गोष्टींचा समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून पतंजली विद्यापीठ, राजा शंकर शाह विद्यापीठ, हेमचंद यादव विद्यापीठ, आणि महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय ही चार विद्यापीठं एकत्र आलेली आहेत. पतंजली विद्यापीठाचे..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121