पाकव्याप्त काश्मिर परत मिळवणारच - एस. जयशंकर

    16-May-2024
Total Views | 165
S. Jaishankar on PoK

नाशिक :
पाकव्याप्त काश्मिर भारताचे अंग आहे. मागच्या सरकारमधील लोकांच्या चुकीमुळे ते आपल्यातून काही काळासाठी गेले आहे. पण संसदेच्या सर्वसंमतीने ते निश्चित परत मिळवले जाईल, यात काही शंका घेण्याची गरज नाही, असा विश्वास केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरूवार, दि. 16 मे रोजी व्यक्त केला. नाशिकच्या कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉल येथे श्वास फाऊंडेशनतर्फे विश्वबंधू भारत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. जयशंकर यांची ज्येष्ठ विचारवंत व लेखक विजय चौथाईवाले आणि कोक्यूयो कॅमलिन लि.चे व्हाईस चेअरमन श्रीराम दांडेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी एस. जयशंकर बोलत होते.

चीनमध्ये राजदूत असताना तिथे वारंवार सांगितले की हा आमचा भाग आहे. परंतु पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांनी पाकव्याप्त काश्मिर हा आमचा भूभाग आहे हे कधी सांगितलेच नाही. १९६३ साली पाकिस्तानने ५ हजार किलोमीटरचा भूभाग चीनला देऊन टाकला. पण चीनलाही माहीत आहे की कायदेशीरदृष्ट्या त्यांची बाजू कमजोर आहे. लोकांना माहीत आहे ३७० कलम जसे रद्द झाले, तसे पाकव्याप्त काश्मिर कधी आपण आपल्या ताब्यात घेऊ हे पाकिस्तानला कळणार पण नाही, असेही यावेळी एस. जयशंकर म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पराभूत सैन्याचे

पराभूत सैन्याचे 'फिल्डमार्शल'; आधी हकालपट्टीची चर्चा, आता लष्कराच्या सर्वोच्च पदावर बढती

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121