संविधानिक संस्थांवरील बिनबुडाचे आरोप लोकशाहीसाठी घातक

आमदार राहुल नार्वेकर; त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर

    09-Dec-2024
Total Views | 46
Rahul Narvekar

मुंबई : "विरोधी पक्षातील नेत्यांनी संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे, हे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे, संवैधानिक संस्थांवर असे आरोप करून त्यांचा सन्मान कमी करू नका", असे प्रतिपादन आमदार अॅड. राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी केले.

विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. नार्वेकर म्हणाले, "विधासभेत विरोधी पक्षनेता कोण असेल? किंवा विरोध पक्ष नेता कोणाला बनवावे, हा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. प्राप्त परिस्थिती, भूतकाळातील अशाप्रकारच्या घटना आणि संविधानातील तरतुदींच्या आधारे विधानसभा अध्यक्ष सभागृहासंबंधित सर्व निर्णय घेतात. हे संवैधानिक पद आहेच; पण १३ कोटी जनतेला न्याय देण्याची ताकद त्यात आहे. कारण त्यांनी निवडून दिलेले २८८ आमदार हे जनतेच्या आशा आकांक्षा मांडण्यासाठी सभागृहात येतात. जर या सदस्यांना न्याय दिला नाही, तर महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेवर अन्याय होईल. म्हणून संसदीय लोकशाही जपण्यासाठी हे पद फारच महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121