राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे ठाकरेंना द्यावेत!

आमदार नितेश राणेंचा घणाघात

    08-Nov-2024
Total Views | 30
Nitesh Rane

मुंबई : संजय राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे त्यांचे मालक उद्धव ठाकरेंना द्यावेत, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) केला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.

नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊत भाजप आणि महायूतीच्या नेत्यांना फुकटचे सल्ले देत होते. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार साहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याला आम्ही कुणीच समर्थन देत नाही. त्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आहे. परंतू, संजय राऊत यावरून आमच्या देवेंद्र फडणवीसजींना संस्कृती आणि संस्कार शिकवत आहेत. पण संजय राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे कधी उद्धव ठाकरेंना दिले आहेत का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्याचे पाप केले होते. त्यावेळी महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार आणि परंपरा दिसली नाही का? कुणाला जेवणाच्या ताटावरून उठवणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?,” असा प्रश्न त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी माफी मागावी!

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवावर टीका केली. त्या चिमुकल्याने अजूनपर्यंत जगसुद्धा पाहिले नाही. अशावेळी त्याच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राची संस्कृती दिसली नाही का? आता तुम्ही कुठल्या तोंडाने दुसर्‍यांना सल्ले देत आहात? उद्धव ठाकरेंना कुणाच्या वैयक्तिक कुटुंबावर हवं ते बोलण्याची मुभा दिली आहे का? उद्धव ठाकरे काहीही बोलले तर ती ठाकरी भाषा आणि दुसरं कुणी काही बोललं तर लगेच महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार काढणार का? त्यामुळे ज्याप्रमाणे सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या वक्तव्याची माफी मागितली. तशीच उद्धव ठाकरेंनादेखील मागायला सांगावी,” असेही ते म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121