कपाळावर टिळा नसलेल्यांकडून खरेदी टाळा; ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांचे आवाहन
11-Nov-2024
Total Views | 75
मुंबई : "ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन संत तुकाराम महाराज यांचे ११वे वंशज शिरीष महाराज ( Shirish Maharaj More ) यांनी सकल हिंदूंना केले. घाटकोपर-पाटेदारवाडी येथील हिंदू प्रबोधन मेळाव्यात रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी ते बोलत होते. त्यांनी हिंदूंच्या होणार्या अन्याय अत्याचारावर भाष्य केले. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरणासारख्या प्रकरणावर भाष्य केले.
’लव्ह जिहाद’प्रकरणी बोलत असताना त्यांनी हळहळ व्यक्त केली. ”हिंदू मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून त्यांची विक्री केली जाते. आज देशात एक लाखाहून अधिक हिंदू युवती गायब आहेत.” यावेळी, त्यांनी उरण येथील ’लव्ह जिहाद’, कर्नाटकातील लक्ष्मी या हिंदू महिलेचे शीतकपाटात १०० तुकडे करून ठेवल्याचे सांगितले.
यावेळी, त्यांनी ’सकल हिंदू समाजा’ला एक राहण्याचे आवाहन केले. नाहीतर, येणार्या काळात हिंदूंचे काही खरे नाही, अशी चिंता व्यक्त केली. पालघर येथे हिंदू साधूंवर झालेल्या अत्याचाराविषयी बोलत असताना त्यांनी ’मॉब लिंचिंग’चा प्रश्न उपस्थित केला. ”ते जर खरेच पोरं पळवणारे लोक असते, तर त्यांनी प्रतिकार केला असता. हे सर्व झाले, याचे कारण म्हणजे त्या साधूंच्या अंगावर भगवे कापड परिधान करण्यात आले होते,” असे त्यांनी सांगितले.
हिंदूंनो, तुटू नका!
दरम्यान, त्यांनी ’बटेंगे तो कटेंगे’ असा नारा व्याख्यानात दिला. हिंदूंनो, तुटू नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी ’फूड जिहाद’वर बोलताना सांगितले की, ”उपवासाला काही लोक खजूर खातात. मात्र, त्या खजुरातील बिया अनेकदा दाताने काढल्या जातात. तेच खजूर आपली हिंदू लोक उपवासासाठी खातो.” 'लॅण्ड जिहाद’वर त्यांनी अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराचे वास्तव सांगितले. ”कानिफनाथ मंदिर आणि भोवतालच्या ४० एकर जागेवर ’वक्फ बोर्डा’ने दावा केला. उद्या आपल्या घरांवरही दावा करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
देवी-देवतांच्या नावाचा वापर करून पोट भरण्याचे काम!
’उद्योग जिहाद’वर भाष्य करताना काही कट्टरपंथींच्या दुकानावर ’राम कृष्ण हरी’ असे नाव लिहिलेले असते. मात्र, ज्यावेळी आपण ऑनलाईन क्यूआर स्कॅनरचा वापर करतो, तेव्हा त्या ठिकाणी भलतेच नाव येते. आपल्या देवी-देवतांच्या नावाचा वापर करून त्यांनी आपले पोट भरण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी ”ज्याच्या कपाळावर नाही, टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा,” असे तिखट आवाहन करत हिंदूंना येणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित राहण्यास सांगितले आहे.