समर्पित स्वयंसेवकास संघाची आदरांजली; सरसंघचालकांकडून वीरेश्वर द्विवेदींच्या आठवणींना उजाळा!

    05-Sep-2023
Total Views | 64
Vireshwar Dwivedi passed away

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आणि राष्ट्रधर्म पत्रिकेचे माजी संपादक वीरेश्वर द्विवेदी (वय ७८) यांचे सोमवारी लखनऊ येथे निधन झाले. गेल्या अनेक काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. महिनाभराहून अधिक काळ त्यांच्यावर लखनऊच्या डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अशा राष्ट्रसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या वीरेश्वर द्विवेदींना रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्याकडून आदरांजली वाहण्यात आली.

ते म्हणाले, "वीरेश्वरजींनी एक मेहनती कार्यकर्ता व स्वयंसेवक बनून संघकार्यात स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी संघ आणि इतर संघटनांमधील विविध जबाबदाऱ्या कर्तृत्वाने आणि समर्पणाने यशस्वीरित्या पार पाडल्या. अभ्यास आणि लेखनाकार्यात विशेष रुची आणि निपुण असलेले वीरेश्वरजी हे लोकांप्रती अत्यंत संवेदनशील होते. वीरेश्वरजींनी आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या 'समिधे'प्रमाणे राष्ट्र-यज्ञात अर्पण केले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेल्या असंख्य कार्यकर्ते आणि कुटुंबाप्रती आम्ही आमच्या संवेदना व्यक्त करतो." त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करत त्यांनी द्विवेदींना आदरांजली वाहिली.

वीरेश्वर द्विवेदी यांनी उत्तर प्रदेशच्या ओराई डीएव्ही महाविद्यालयातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ओराईच्या डीएव्ही कॉलेजचे ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही होते. विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या प्रेरणेतून १९७२ रोजी पत्रकारिता क्षेत्रातून मुक्त होऊन ते संघाचे प्रचारक बनले. सध्या त्यांच्याकडे संघाच्या कुटुंब प्रबोधन या गतिविधीचे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे संयुक्त क्षेत्र प्रमुख म्हणून दायित्व होते.

अग्रलेख
जरुर वाचा
पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121