ज्ञानवापीस ‘मशिद’ म्हटले तर वाद होणारच : योगी आदित्यनाथ

मुस्लिमांना ऐतिहासिक चूक सुधारण्याचे आवाहन

    31-Jul-2023
Total Views | 117
Uttar Pradesh CM Yogi Adityanath On Gyanvapi

नवी दिल्ली
: ज्ञानवापीमध्ये काय आहे, हे जगजाहिर आहे. मात्र, मुस्लिमांनी ऐतिहासिक चूक न सुधारता ज्ञानवापीस ‘मशिद’ संबोधले; तर वाद होणारच असे रोखठोक प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) या वृत्तसंस्थेस मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी – काशी विश्वनाथ प्रकरणी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ज्ञानवापीस ‘मशिद’ कोणी संबोधत असेल तर त्यास आक्षेप घेतला जाईल आणि त्यामुळे नक्कीच वाद निर्माण होतील. ज्ञानवापी ही मशिद असल्याचा दावा करणाऱ्यांनी तेथे त्रिशुळ कसे आहे, तेथे ज्योतिर्लिंग आणि हिंदू देवतांच्या प्रतिमा कशा आल्या याचे उत्तर द्यावे. या सर्व गोष्टी तर आम्ही (हिंदूंनी) तेथे ठेवलेल्या नाही. ज्ञानवापीच्या भिंती तर सर्वकाही अतिशय स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे देवाने प्रत्येकास दृष्टी दिली असून त्याद्वारे ज्ञानवापीकडे बघण्याची गरज आहे. खरे तर ज्ञानवापीविषयी तोडगा काढण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून येण्याची गरज होती. आमच्याकडून ऐतिहासिक चूक झाली असून आता त्या चुकीस सुधारण्याची आमची ईच्छा आहे, असे मुस्लिमांनी म्हणण्याची गरज होती; असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या प्रतिपादनास मुस्लिमांनी तत्काळ आक्षेप घेतला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क म्हणाले की, मुस्लिमांकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि मुस्लिमांन कधीही संघर्ष केलेला नाही. त्यांनी (हिंदू) जाणीवपूर्वक छेडछाड करून त्यास मंदिर असे संबोधण्यास सुरूवात केली असल्याचे बर्क यांनी म्हटले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य हिंदू समाजासाठी महत्त्वाचे असून काशीसह श्रीकृष्णजन्मभूमीसाठी शुकसंकेत असल्याचे मत काशी विद्वत परिषदेचे पश्चिम भारत प्रभारी कार्ष्णी नागेंद्र महाराज यांनी म्हटले आहे.

आता तरी अतिक्रमण हटवा – दिनेश शर्मा, श्रीकृष्णजन्मभूमी याचिकाकर्ते

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील याचिकाकर्ते दिनेश शर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर ज्ञानवापी आणि श्रीकृष्णजन्मस्थान येथील बेकायदा बांधकाम काढून घेण्यासाठी मुस्लिमांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. श्रीकृष्णजन्मभूमी येथील अतिक्रमण हटविल्यास न्यासातर्फे मुस्लिमांना मेवात येथे १० एकर जमीन देण्याची तयारी असल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई ..

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121