गेहलोत सरकारची हुकुमशाही! महिलांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करणाऱ्या आमदाराला केली धक्काबुक्की

    24-Jul-2023
Total Views | 34
rajendra singh guda
 
जयपूर : राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांना काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत जाऊ दिले नाही. त्यांना मार्शलने सभागृहाबाहेर नेले, त्यादरम्यान त्यांना मारहाणही करण्यात आली. आपल्याच सरकारला आरसा दाखवताना राजेंद्र सिंह गुढा म्हणाले होते की, राजस्थान हे महिलांवरील गुन्ह्यांमध्ये नंबर १ राज्य बनले आहे. विधानसभेत हे वक्तव्य केल्यानंतर काही तासांनी त्यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यात आल्याची बातमी आली. आता बळाचा वापर करून त्यांना विधानसभेतूनही बाहेर काढले.
 
सोमवारी (२४ जुलै, २०२३) राजेंद्र सिंह गुढा यांना जयपूरच्या विधानसभेतही प्रवेश दिला गेला नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते ढसाढसा रडले. त्याने सांगितले की ५० लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांना धक्काबुक्की केली आणि लाथ मारली. त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेत्यांनी त्यांना विधानसभेतून बाहेर काढले. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. त्यांच्यावर भाजपसोबत असल्याचा आरोप करण्यात आला.
 
 
राजेंद्र सिंह गुढा विधानसभेच्या गेटवर पोहोचताच तिथे जमलेल्या मार्शलने त्यांना घेरले. वारंवार विनंती करूनही त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. विधानसभेत शून्य काळात 'लाल डायरी'वर चर्चा झाली. 'लाल डायरी' हलवत ते विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या आसनाजवळ पोहोचले होते. यानंतर राजेंद्र सिंह गुढा यांचा राजस्थानच्या संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्याशीही वाद झाला.
 
'लाल डायरी' उघड न करण्याचा इशारा त्यांनी दिला. वारंवार वेळ मागूनही स्पीकर टेबलवर 'लाल डायरी' ठेवण्यास वेळ देत नसल्याचे राजेंद्र सिंह गुढा यांनी सांगितले. मला मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे, आमदार म्हणून बोलण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की काँग्रेसच्या मंत्र्यांनी त्यांना खाली पाडले, शांती धारिवाल यांनी त्यांना लाथ मारली आणि महेश जोशी यांनीही मारहाण केली.
 
या सर्व प्रकरणावर बोलतांना राजेंद्र सिंह गुढा म्हणाले की, राज्यात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांमुळे राज्य बदनाम झाले आहे. बलात्कार्‍यांना आमचे लोक मदत करत आहेत. काँग्रेसमध्ये असे लोक बसले आहेत ज्यांच्यावर चित्रपट बनवले जात आहेत.
 
 
  
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121