मुंबई : भारतातील शहरांमध्ये पगारदार व्यक्तीचे सरासरी मासिक वेतन २१,६४७ रुपये इतके आहे. असा दावा आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात करण्यात आला आहे. पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे नुसार, शहरी भारतातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला दिवसाला ३८५ रोज मिळतो. हे आकडे शहरी भागातील कामगारांचे आहेत.
दुसरीकडे, ग्रामीण भारतातील पगारदार व्यक्तीचे सरासरी उत्पन्न १४,७०० रुपये प्रति महिना इतके आहे. सोबतच ग्रामीण भागातील रोजंदारी कामगारांचे दिवसाची मजुरी ३६८ रुपये इतकी रुपये आहे. २०२१ मध्ये ग्रामीण भागातील रोजंदारी कामगारांची मजुरी ३०२ रुपये इतकी होती.
भारतातील ४६%, रोजगार शेती क्षेत्राशी निगडीत आहे. शेती व्यवसायावर निसर्गावर अवलंबून असल्यामुळे खराब हवामानाचा फटका या क्षेत्रातील रोजगारावर पडतो. भारतातील ७२ टक्के नोकऱ्या या असंघटित क्षेत्रात आहेत. या कामगारांना संघटित क्षेत्रातील नोकऱ्यात आणण्याची मोठी जबाबदारी केंद्र आणि देशातील सर्वच राज्यातील सरकारांवर आहे.