अमेरिका – भारत मैत्री पुढे नेण्यास भारत कटीबध्द – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एलॉन मस्क यांच्याशी साधला संवाद, पंतप्रधानांचे महत्वाचे ट्विट

    18-Apr-2025
Total Views | 13
modi
 
नवी दिल्ली : अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्री अधिक दृढ करण्यास भारत कटीबध्द आहे, असे सांगत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अमेरिका संबंधांची दिशा स्पष्ट केली. या गोष्टीबाबत ट्विटरवर माहिती देत पंतप्रधानांनी यावर भाष्य केले आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी जगातील सर्वात प्रसिध्द उद्योगपतींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले आहे.
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये याबद्दल माहिती देताना म्हटले की “एलॉन मस्क यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला, या चर्चेत अमेरिका दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेतील विषयांचाही समावेश होता. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील सहकार्य दृढ होण्यासाठी प्रचंड वाव असून त्यामध्ये मोठा वाटा हा तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा असणार आहे. या महत्वाच्या विषयांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटीबध्द आहे” असे आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
 
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत चीन आणि अमेरिका या दोन बलाढ्य राष्ट्रांत सुरु असलेल्या व्यापारयुध्दाने चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेने २ एप्रिल रोजी भारतासह जगातील ७० देशांवर वाढीव आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर त्यांनी चीन सोडून इतर सर्व देशांवरील वाढीव आयातशुल्कास स्थगिती दिली होती. यामुळे चीडीस पेटून चीननेही अमेरिकेवर आयातशुल्क लादण्याचे अस्त्र उपसले होते. सध्या अमेरिकेकडून चीनी वस्तुंवर २४५ टक्के आयातशुल्क लादण्यात आले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनकडून अमेरिकेवर १२५ टक्के आयातशुल्क लादण्यात आले आहे. या दोन मोठ्या अर्थसत्तांमधील या व्यापारयुध्दाने जागतिक अर्थव्यवस्थेवर चिंतेचे काळे ढग पसरले आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121