इस्त्रायल-हमास युद्ध: गाझामधील मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर

    24-Oct-2023
Total Views | 68

Gaza


मुंबई :
इस्त्रायल आणि हमासमध्ये अजूनही युद्घ सुरुच आहे. इस्त्रायलकडून गाझावर हल्ले सुरुच आहेत. या युद्धामध्ये हजारों निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. दरम्यान, आतापर्यंत गाझामधील मृतांची संख्या ५ हजारांच्या वर गेली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत गाझामधील मृतांचा आकडा ५०८७ वर पोहोचला आहे. यात २०५५ मुले, १११९ महिला आणि २१७ वृद्धांचा समावेश आहे. तसेच १५ हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलनेही गाझा पट्टीवर हल्ले सुरु केले आहेत. तसेच इस्त्रायलने गाझा पट्टीत इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांवर बंदी आणली आहे. त्यामुळे गाझा पट्टीतील नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे.
 
यातच आता गाझातील मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर जाऊन पोहोचला आहे. दोन्ही बाजूंकडून युद्ध संपवण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नाही. दरम्यान, भारताने गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पाठवली आहे. यामध्ये विविध अत्यावश्यक सामग्री पाठवण्यात आली आहे. 



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121