मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले आहे. इंडी आघाडीची स्वप्ने यामुळे धुळीस मिळाली असून महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईतील पक्षाच्या मुख्यालयात प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी सुरू केली असल्याचे सांगतानाच खुद्द प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तसेच, इंडिया आघाडीत सहभागी होण्याकरिता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले होते. पण काही प्रतिसाद न मिळाल्याने वंचितला हा निर्णय घ्यावा लागला आहे.