जनतेच्या आरोग्याची खात्री करणे, हे एक बहुआयामी आव्हान आहे. या आव्हानामध्ये केवळ असंख्य प्रकारच्या धोक्यांचा समावेश होतो. भारतामध्ये हवामानाच्या गंभीर घटनांची संख्या वाढत असल्याने, देशाचे पर्यावरणीय आरोग्य अधिकाधिक महत्त्वाचे बनले आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखणे, हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त जाणून घेऊया पर्यावरणीय आरोग्याबद्दल...
ग्रामीण आणि शहरी रहिवासी आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्परसंबंधांवर लक्ष केंद्रित करणारी पर्यावरणीय आरोग्य ही सार्वजनिक आरोग्ययंत्रणेअंतर्गत येणारी शाखा आहे.पर्यावरणीय आरोग्य सांभाळून, त्याचे संवर्धन करून, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण तयार करून, मानवी आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देते. हवामानात होणारे घातक बदल कमी करणे, घातक सामग्रीचे सुरक्षित व्यवस्थापन करणे, जमिनीच्या वापराचे उत्तम नियोजन करणे, तसेच ‘रेडिओलॉजिकल’ हेल्थ, अन्नसुरक्षा, विषारी रसायनांचा प्रादुर्भाव, पाण्यापासून पसरणार्या आजारांचे प्रतिबंधन करणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आणि अशा बर्याच काही गोष्टींचा समावेश पर्यावरण आरोग्यात येतो.
पर्यावरणीय आरोग्य व्यावसायिक अनेकदा ‘एपिडेमियोलॉजिस्ट, ‘टॉक्सिकोलॉजिस्ट’, ‘सॅनिटेरियन्स’, औद्योगिक स्वच्छताशास्त्रज्ञ आणि पर्यावरणीय विषयक विशेषज्ञ म्हणून काम करतात. जनतेचे आरोग्य सुनिश्चित करणे हेच पर्यावरणीय आरोग्य जपणे आहे.
2011 मध्ये इंडोनेशियातील बाली येथील देनपसार येथे ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ’च्या बैठक आणि पर्यावरणीय आरोग्य युवा शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचा उत्सव सुरू झाला. पर्यावरणीय आरोग्यासंबंधी विविध समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ’ने या दिवसाची स्थापना केली.‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ’ ही संस्था मानवी आरोग्यास धोका निर्माण करणार्या पर्यावरणीय आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्यांसाठी गेली 32 वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.
सन 2022 च्या जागतिक पर्यावरण आरोग्य दिवसासाठी, ‘शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरणीय आरोग्य प्रणाली मजबूत करणे’ ही ‘थीम’ ठरवली गेली आहे. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकास उद्दिष्टे, ज्यांना जागतिक उद्दिष्टे म्हणूनदेखील ओळखले जाते. ही उद्दिष्टे, दारिद्य्र समाप्त करण्यासाठी, पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आणि 2030 र्यंत सर्व लोक शांतता आणि समृद्धीचा आनंद लुटतील, याची खात्री करण्यासाठी सार्वत्रिक आवाहन म्हणून स्वीकारली आहेत. ही 17 शाश्वत विकास उद्दिष्टे, एकात्मिक आहेत.
संयुक्त राष्ट्राला हे ठाऊक आहे की, एका क्षेत्रातील कृती इतर क्षेत्रातदेखील परिणाम दाखवणारच आणि या विकासाने सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्वत विकास संतुलित ठेवणे अत्यावश्यक आहे. या ‘एसडीजी’ची अंमलबजावणी पर्यावरणीय आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
सर्व प्रकारचे प्रदूषण आणि पर्यावरणीय चिंता एकमेकांवर प्रभाव टाकण्यासाठी एकमेकांशी जोडलेले आहेत व म्हणूनच आपण सगळ्यांनीच एकत्रितपणे सामना करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्यावरील पर्यावरणाचा परिणाम कमी करण्यासाठी समाजासह विविध भागधारकांना एकत्र काम करावे लागेल. या प्रमुख पर्यावरणीय आरोग्य चिंतेमध्ये हे खालील पाच समस्यांचा समावेश होतो. एवढा सगळं वाचून मला खात्री आहे, तुम्ही पण या 2022च्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य दिवसानिमित्त काहीतरी नक्कीच कराल. काही नाही, तर तुम्ही ज्या सगळ्यांना भेटाल, त्यांना नक्की सांगा की, आरोग्य जसं आपलं महत्त्वाचं तसं पर्यावरणाचेदेखील आरोग्य महत्त्वाचे आहे.
रोगराई
रोगाचे शमन, नियंत्रण आणि संसर्गजन्य रोगांविरुद्ध बचाव, हे पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम करणारे मुख्य पैलू आहेत. पर्यावरणाचे आरोग्य या रोगांविरुद्ध लढ्याचे महत्त्वाचा घटक आहे.
प्रदूषण
हवामान बदल आणि जैवविविधतेशी संबंधित घटना, पर्यावरणीय चिंतेच्या प्राथमिक कारणांपैकी एक आहे. सर्व प्रकारचे पाणी, हवा, माती, किरणोत्सर्गी, ध्वनी, प्रकाश आणि थर्मल प्रदूषण पर्यावरणावर परिणाम करतात. प्रदूषित आणि खराब हवा, माती आणि पाण्याची बिघडणारी गुणवत्ता तसेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ चे सार्वजनिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो. पाणी आणि वायुप्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब आहे, ज्यामुळे आर्थिक ताण आणि मानवी आणि सागरी जीवनाला धोका निर्माण होतो.
हवामान बदल
‘ग्रीन हाऊस’ वायूंमुळे होत असलेल्या हवामान बदलांमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. या बदलांमुळे सागरी अधिवास व संपूर्ण पृथ्वीच्या परिसंस्थांवर परिणाम केला आहे. जगातील समुद्र पातळीत होणार्या वाढीमुळे, भरपूर प्रमाणात म ानवी वसाहती धोक्यात येत आहेत.
जंगलतोड आणि जंगलांचा होणारा नाश
यात लोकांना प्राणवायू, अन्न, पाणी आणि औषध देणार्या झाडांचा नाश पर्यावरणसाठी भयंकर हानिकारक आहे. नैसर्गिक जंगलातील आग, बेकायदेशीर वृक्षतोड, कृषी पद्धती आणि व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाची कापणी यामुळे जंगले कमी होत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे आणि ‘ग्रीन हाऊस’ वायूचे उत्सर्जन चिंताजनक दराने वाढत आहे. जंगलतोड आणि जंगलाचा होणारा नाश हा खूप महत्त्वाचा घटक आहे.
घातक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा
कचरा व्यवस्थापन, घातक साहित्य व्यवस्थापन, कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठीची व्यवस्था, दूषित जागेवर संवर्धनासाठीचे उपाय, भूमिगत साठवण टाक्यांमधून होणारी गळती रोखणे, आपत्कालीन प्रतिसाद आणि पर्यावरणात घातक पदार्थ सोडण्यापासून बचाव करणे या सगळ्या गोष्टी पर्यावरणाच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
-डॉ. मयूरेश जोशी