पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द नाहीत

    04-Apr-2020
Total Views | 114

pune university_1 &n



सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियमित होणार

पुणे : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.


कोरोनामुळे सरकारने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र ही सुट्टी जाहीर होण्यापूर्वी कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवी परीक्षा सुरु होत्या. तर पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.


पुणे विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यानंतर लॉकडाऊनंतर या सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉकडाऊननंतर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121