आंध्रप्रदेशला असणार तीन राजधान्या - जगनमोहन रेड्डी

    18-Dec-2019
Total Views | 49

j_1  H x W: 0 x


आंध्रप्रदेश : नव्या आंध्र प्रदेश राज्याच्या तीन अधिकृत राजधान्या असतील, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी मंगळवारी विधानसभेत केली. सत्तेचे आणि कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे, परंतु आता आंध्र प्रदेशने आपली नवीन राजधानी बनवण्याची घोषणा केली आहे.


आंध्र प्रदेशच्या तीन राजधानी असतील आणि या राजधान्या स्वतंत्रपणे कार्य करतील. कार्यकारी
, न्यायिक व विधानमंडळ अशी त्यांची विभागणी केली जाईल, असे जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. तसेच राज्याला तीन राजधान्यांची गरज असून त्याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. याबाबत विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.


अमरावती (राजकीय), विशाखापट्टणम (कार्यकारी), कुरुनुल (न्यायिक) ही शहरे संभाव्य राजधानीसाठी निवडली जाणार आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121