अमेरिकेच्या 'त्या' पावलाचे भारताकडून स्वागत

    02-Aug-2018
Total Views | 9


नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंबंधीच्या अमेरिकेच्या निर्णयाचे भारत सरकारकडून स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकेने घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य असून यामुळे भारत आणि अमेरिका यांच्या दहशतवादीविरोधी भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

'अमेरिकेने उचलले पाऊल हे अत्यंत स्तुत्य असे असून यामुळे भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अधिक बळ मिळाली आहे, असे मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेने हे पाऊल उचलल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या मंगळवारी अमेरिकेने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल रेहमान अल-दाखिल याच्यासह अन्य दोघाजणांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. १९९४ ते २००२ दरम्यान भारतात आणि विशेषतः काश्मिरात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये अब्दुलचा हात असल्याचे पुरावे अमेरिकेला मिळाले होते. त्यानुसार अमेरिकेने यावर कारवाई करत अब्दुल आणि अन्य दोघाजणांना जागतिक दहशतवाद्यांच्या यादीमध्ये सामील केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121