वायनाड भूस्खलनग्रस्तांसाठी सुरक्षित ठिकाणी टाउनशिपची घोषणा!
04-Aug-2024
Total Views | 21
नवी दिल्ली : वायनाड येथील भूस्खलनामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले असून केरळ सरकारकडून पुनर्वसन करण्यात येत आहे. सरकारकडून भूस्खलन बाधितांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन प्रक्रिया योजना आखत आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, जागतिक समुदायाकडून जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आणि घरे बांधण्यासाठी विविध ऑफर आल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १०० घरे बांधण्याची ऑफर दिली असून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन केला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सरकारकडून ऑफरचे समन्वय साधण्यासाठी संयुक्त जमीन महसूल आयुक्त ए गीता यांच्या अंतर्गत एक 'हेल्प फॉर वायनाड' सेल तयार करण्यात आला आहे. सरकार वाचलेल्यांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन प्रक्रियेची योजना आखत असून जलद पूर्ण करण्याच्या उद्देशाने सरकारकडून करण्यात येत आहे. मुलांचे शिक्षण विस्कळीत होणार नाही याची खात्री करण्यासाठी शिक्षण मंत्री वायनाडला भेट देतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
केरळ सरकारने जाहीर केले की, वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई प्रदेशात झालेल्या आपत्तीजनक भूस्खलनामुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सुरक्षित क्षेत्रात एक टाउनशिप स्थापन केली जाईल. तसेच, पुनर्वसनाची सर्वसमावेशक प्रक्रिया नियोजित असून ती वेगाने राबविली जाईल. वायनाड भूस्खलनग्रस्तांसाठी सुरक्षित ठिकाणी टाउनशिपची घोषणा सरकारकडून केली आहे.