गुंतवणूक क्षेत्राच्या आगामी सरकारकडून अपेक्षा...

    18-May-2024
Total Views | 47
investment sector
 
गेल्या २५ वर्षांपासून मी गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे. इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, कंपनी एफडी, इक्विटी मार्केट, फ्युचर ऑप्शन अशा विविध प्रकारच्या आर्थिक सेवा मी १२०० पेक्षा अधिक कुटुंबीयांना देतो आहे. माझ्या आजवरच्या प्रवासात गुंतवणुकीचे बदलते प्रकार व गुंतवणूकदारांचीही बदललेली मानसिकता, याचा अगदी चांगला अभ्यास झाला. तेव्हा, आता निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीत, एक प्रश्न पडला की, सरकारच्या हातात गुंतवणूकदारांची मानसिकता बदलण्याची क्षमता आहे का? आणि त्याविषयी आगामी सत्तेवर येणार्‍या सरकारकडून माझ्या याबाबतच्या काही अपेक्षा यानिमित्ताने मांडत आहे.
 
सन २००० पासून वर-खाली होणारे व्याजदर, शेअर मार्केटपासून लांब राहिलेला मध्यमवर्ग आता त्याशिवाय बोलत नाही. तसेच दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीपासून आत्ताची पिढी कुठे तरी फारकत घेताना दिसते. त्याचे परिणाम आज लगेचच नाही, पण उद्या नक्की जाणवतील. जी आर्थिक संकटे मागच्या २५ वर्षांत आली, त्यात भारतीय तग धरू शकले. कारण, त्यांचा वर्षानुवर्षे सुरक्षित व दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवरील विश्वास. २००८ साली झालेली जागतिक अर्थव्यवस्थेची पडझड, नंतर ‘कोविड’सारख्या संकटात शेअर मार्केटची झालेली अवस्था आणि आता एकूणच बदलणारी समाजव्यवस्था, या सर्वांचाही विचार करावा लागेल. एकत्र कुटुंब पद्धतीपासून ते आता लिव्ह-इन-रिलेशनपशीपपर्यंत समाजव्यवस्थेनेही कूस बदललेली दिसते. तशीच अवस्था गुंतवणुकीच्या क्षेत्रातही.
 
अल्प मुदतीत अधिकाधिक परतावा मिळावा म्हणून सगळा कल अशा गुंतवणुकीत गेला, तर भविष्यात काय होईल? याबाबत कुठे तरी सरकारने हस्तक्षेप करणे मला आवश्यक वाटते. आता पूर्वीसारखा पीएफसुद्धा जमा होत नाही. पीपीएफ, पोस्ट, एलआयसी ही गुंतवणूक आजच्या पिढीला जुन्या विचारांची वाटते. अमेरिकेसारख्या देशात असलेल्या सामाजिक जबाबदारीचे सरकारने घेतलेले दायित्व पाहून आपल्याकडे २००४ सालापासून सरकारी पेन्शन बंद करण्यात आली आहे. आज ‘कलम ८०सी’ अंतर्गतच्या फायद्यासाठी गुंतवणूक केली जात होती, ती सुद्धा ’ळपलेाश ींरु पशु ीशसळाश’मुळे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आताच्या समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी काय होऊ शकते? समाज जर स्वतःच्या बचतीवर अवलंबून असेल, तर सरकारचे दायित्व कमी होते. पण, आज जे सामाजिक-आर्थिक पातळीवर बदल होत आहेत, ते आपण अमेरिकन जीवनशैलीकडे जात आहोत का, याची भीती वाटते.
 
भारताने प्रगती करायलाच हवी, पण ती आपली तत्त्वं व मूल्यं जोपासून. कारण, या तत्त्वं आणि मूल्यांमुळेच आपण आजवर अनेक संकटांचा सामना करू शकलो. त्या मूल्यांवर आता गांभीर्याने पुन्हा विचार व्हायला हवा.गुंतवणुकीत जोखीम किती असायला हवी व दीर्घ मुदत का हवी, त्याबद्दल काम करणे आवश्यक आहे. गुंतवणूक योजना देखील बदलायला हव्यात. त्याकरिता काही ठोस तरतुदी सरकारने कराव्यात. ’थशरश्रींह ेष छरींळेप’ या पुस्तकात अ‍ॅडम स्मिथ म्हणतात, “संपत्ती ही विकली जाता कामा नये. ती वाटली जाता कामा नये. ती पिढ्यान्पिढ्या पटीत वाटून हस्तांतरित केली जावी, तर देश श्रीमंत होईल.” पण, संपत्ती टिकण्याकरिता इन्शुरन्स आणि पुरेशी रोकड असली पाहिजे. म्हणजेच, संतुलित गुंतवणूक व विम्याचे कवच प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहे.

योगेश कल्हापुरे
(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत.)

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121