मुंबई : पालघर जिल्ह्यामध्ये पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष आहे. अनेक महिलांना दोन ते तीन किलोमीटर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते तरी पाणी मिळत नाही ही समस्या केवळ या वर्षी नाही तर अनेक वर्ष दरवर्षी असते. यामुळे येथील शेतकरी उन्हाळ्यामध्ये आपली आपली खेडे सोडून शहरामध्ये जात असतात आणि यामुळे त्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी वंचित व्हावे लागते या समस्येचा अभ्यास करून लायन्स इंटरनॅशनल चे डिस्टिक गव्हर्नर डॉक्टर दीपक चौधरी यांनी या खेड्यांमध्ये 100. चेक डॅम किंवा पाणी बंधारे बांधण्याचा संकल्प केला. याच संकल्पना चा 80 वा पाणी बंधारा त्यांनी दि. १७ मे रोजी सफाळा येथील उंबरपाडा या खेड्यामध्ये लोकार्पण सोहळा करून पूर्ण करण्यात आला.
या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या जवळ जवळ 100 बोरवेल ला पाणी मिळेलच परंतु येथील पाण्याची पातळी जमीतीतील पाण्याची पातळी वाढणार आहे या पाणी बंदराचे विशेष म्हणजे याच्या जवळच असलेल्या विहिरीपासून ग्रामपंचायत तर्फे पाणी शुद्ध करून गावकऱ्यांना अत्यल्प दरात देण्यात येत आहे या पाणी बंधाऱ्यामुळे यावेळी वर्षभर आणि विशेषता उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी लागणार आहे आणि त्यांच्या शंभर चेक डॅम या संकल्प अंतर्गत आज पर्यंत त्यांनी 80 पाणी बंधारे बांधून पूर्ण केले आहेत ज्यांची कॅपॅसिटी क्षमता ही जवळजवळ 120 करोड लिटर वॉटर एवढी आहे. या कामामुळे त्यांनी हे सिद्ध करून दाखविले की योग्य कार्य केल्यास योग्य पद्धतीने वाहत जाणारे पाण्याचे पाणी वेळेवर अडवल्यास हे पाणी या दुर्गम भागामध्ये वर्षभर विशेषतः उन्हाळ्यामध्ये केवळ पिण्यासाठी नाही तर शेतीसाठी भाजीपाल्यासाठी वापरू शकतो त्यांनी या बांधलेल्या शेकड्यामुळे प्रत्येक खेडे हे आत्मनिर्भर झालेले आहे.
एक यशस्वी उपक्रम राबवण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे दीपक चौधरी यांनी संकल्प केलेले शंभर चेक द्या लवकरच बनवतात नेण्यात येणार आहेत दीपक चौधरी यांनी केलेल्या पाणी बंदराच्या संकल्प मुळे अनेक ग्रामस्थ त्यांना दुवा देत आहेत आणि ते सतत करीत असलेल्या प्रयत्नाला संपूर्णपणे सहकार्य करण्याचा अनेक देणगीदार सीएसआर पार्टनर यांनी आश्वासन दिलेला आहे. त्यांचे सर्व ग्रामस्थांना देणगी जणांना आवाहन आहे की आपणही अशा प्रकारचे छोटे पाणी बंधारे एकदम बांधून या परिसरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवण्यास मदत करूया.