महाविकास आघाडीतील बिघाडी भाजपाच्या पथ्यावर!

कपिल पाटील यांना होणार फायदा

    06-Apr-2024
Total Views | 65
MahaVikasAghadi election
 

कल्याण(जान्हवी मोर्ये ) :     भिवंडी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भिवंडी हा कॉग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असताना ही राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर करताना कॉग्रेसला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत आहे. यावरून महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद सुरू असल्याचे उघड झाले आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून झालेली बिघाडी ही भाजपाचे खासदार आणि लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवार मंत्री कपिल पाटील यांच्या पथ्यावर पडणारी आहे.

बाळ्य़ा मामा यांना उमेदवारी जाहीर होताच कॉग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि इच्छूक उमेदवार दयानंद चोरगे यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात न घेता ही जागा घोषित केल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे यांनी सांगलीची जागा राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसला विचारात न घेता जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदार संघातील जागा राष्ट्रवादीने कॉग्रेसला विचारात न घेता जाहीर केली आहे. या मतदार संघातून 9 वेळा कॉग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. दयानंद चोरगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शविली आहे. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादाचा फायदा या मतदार संघातून उमेदवारी मिळालेले कपिल पाटील यांना होणार आहे.


हे वाचलंत का? - सांगलीच्या बदल्यात 'उबाठा'कडून काँग्रेसकडे १०० कोटींची मागणी!
 

भाजपामध्ये एकसंघपणा आहे. वैयक्तीक मतभेद नाही. पक्षहितासाठी इतर गोष्टी गौण मानल्या जातात. याउलट महाविकास आघाडीत जागा वाटपावरून एकमेकांना विश्वासात न घेतल्याने फूट पडल्याचे दिसत आहे. भिंवडी हा कॉग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. दामू शिंगडापासून सुरेश टावरे पर्यंत विजयाचा इतिहास आहे. या मतदारसंघातून 9 वेळा कॉग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. पण सध्या संघटना निष्क्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. कॉग्रेस येथून हद्दपार झाली आहे.

भाजपाकडून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणूकीत कपिल पाटील यांच्या गळ्य़ात विजयाची माळ पडली आहे. तसेच त्यांनी या परिसरात केलेल्या विकासकामांमुळे स्वत: चा वेगळा असा ठसा उमटविला आहे. पाटील यांनी 35 हजार कोटी रूपयांची विकासकामे येथे केली. गेल्या सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला कल्याण मुरबाड रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळविलेली आहे. त्यासाठीचे भूसंपादनाचे काम सुरू आहे. ठाणे भिवंडी हा आठ पदरी रस्ता यांचे श्रेय देखील पाटील यांनाच जाते. या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय दुर्गाडी खाडी पूल, राजणोली उड्डाणपूल , माणकोली पूल हे प्रकल्प ही पूर्णत्वास येत आहे. गावागावात त्यांनी नळ योजना आणली. त्यांसाठी 1600 कोटी रूपयांचा निधी त्यांनी आणला. त्यांनी परिसराचा केलेला कायापालट यामुळे पाटील यंदा विजयाची हॅटट्रीक करतील का हे पाहावे लागणार आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121