"ज्यांनी भगवा सोडून दुसरा रंग निवडला त्यांनाही होळीच्या शुभेच्छा!"

श्रीकांत शिंदेंचा टोला

    25-Mar-2024
Total Views | 132
 
Thackeray & Shinde
 
मुंबई : ज्यांनी भगवा सोडून दुसरा रंग निवडला त्यांनाही होळीच्या शुभेच्छा, असे म्हणत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच आम्ही भगवा सोडला नाही, तर तो पुढे नेत आहोत, असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
श्रीकांत शिंदे म्हणाले की, "आज सगळे लोक वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलेले आहेत. पण संपूर्ण भारत एकाच रंगात रंगलेला आहे तो रंग म्हणजे भगवा रंग. या भगव्या रंगात सगळे लोकं रंगून गेलेले आहेत. होळीच्या दिवशी सगळ्यांच्या मनात एकमेकांबद्दल असलेले रुसवे फुगवे बाजूला ठेवून सगळ्यांनी एकमेकांबरोबर रंगपंचमी साजरी केली पाहिजे. या दिवशी सगळे विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येऊन वर्षभराची कटुता रंगपंचमीच्या निमित्ताने दूर होत असते."
 
हे वाचलंत का? -  धानोरकरांनी वडेट्टीवारांचं नाव घेणं टाळलं; काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
 
ते पुढे म्हणाले की, "काही लोकांनी भगवा रंग सोडलेला आहे. ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडून दुसरा रंग धारण केला आहे त्यांना तो लखलाभ होवो. आम्ही बाळासाहेबांचा, हिंदूत्वाचा आणि प्रभू श्रीरामांचा भगवा रंग सोडलेला नसून तो पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत," असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे.
 
"आम्ही मतदारसंघात लोकांबरोबर रंगपंचमी साजरी करणार आहोत. टेंभी नाक्याला धर्मवीर आनंद दिघेंनी वेगवेगळे महोत्सव सुरु केले. त्यातीलच एक रंगपंचमीचा महोत्सवदेखील दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात टेंभी नाक्याला रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या उत्सवात सहभागी होणार आहेत," अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 
 

अग्रलेख
जरुर वाचा
आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

"लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121