"शाहजहान खानला कधी अटक करणार?" - न्यायालयाचा 'ममता सरकार'ला सवाल
20-Feb-2024
Total Views | 33
कोलकाता : संदेशखली अत्याचार प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या ममता सरकारला फटकारले आहे. पश्चिम बंगालमध्ये, पीडितांनी त्यांच्या निवेदनात स्पष्टपणे तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याचे नाव आरोपी म्हणून घेतले असताना तरीही तो मुक्त कसा? असा सवाल कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला केला.
न्यायालयात या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या खंडपीठाने म्हटले की, “समस्येच्या मुळाशी असलेली व्यक्ती अद्याप पकडली गेली नसून ती फरार आहे, हे धक्कादायक आहे. त्याच्यावर हजारो खोटे आरोप आहेत, पण त्यातला एकही खरा असेल तर त्याची चौकशी करावी. तुम्ही लोकांना विनाकारण त्रास देत आहात.”
आपल्या निर्णयात म्हटले आहे की, “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत. तो कायद्याचा अनादर करू शकत नाही. १८ दिवस झाले आहेत. या संपूर्ण समस्येचे मूळ असलेला एक माणूस अद्याप फरार आहे. त्याला संरक्षण मिळाले आहे की नाही हे देखील आम्हाला माहित नाही परंतु हे निश्चित आहे की तो पकडला गेला नाही."
कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेस नेत्याला अटक न केल्याबद्दल बंगाल सरकारला फटकारले असताना, न्यायालयाच्या खंडपीठाने दि. २० फेब्रुवारी २०२४ बंगालचे विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांना हिंसाचारग्रस्त संदेशखळी येथे जाण्याची परवानगी दिली.