मुंबई : मनोज जरांगेंचं नाव न घेता मंत्री छगन भुजबळांनी अधिवेशनात जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केल्यानंतरही जरांगे उपोषणाला का बसले आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याविरोधात बोलल्यानंतर आम्हाला जाहीर धमक्या दिल्या जातात. याला आळा कसा बसणार, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला.
मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्यात असे प्रकार सुरू राहतील, तर आम्ही काय समजायचं? त्यांना ओबीसीतूनच आरक्षण का हवं आहे?, असा सवालही छगन भुजबळांनी विचारला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली. भुजबळांना मिळणाऱ्या धमक्यांची राज्य सरकारने दखल घेऊन ताबडतोब ती कार्यवाही करावी, असेही भूजबळ म्हणाले. मारूतीच्या शेपटाप्रमाणे यांच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत, अशी टीका त्यांनी केली.
कारण नसताना आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या जातात. २७ जानेवारीला आंदोलन मागे घेतल्यानंतर पेढे वाटले. मात्र, पुन्हा १० तारीखला उपोषण सुरू केल. हे का आणि कशासाठी, असा सवालही भुजबळांनी केला. आता ते म्हणतात मी उपोषण स्थळावरुन उठणार नाहीत. त्यांच्यावर काही बोललं की ते धमकी देणार. याची गंभीर दखल घेत राहुल नार्वेकरांनी याची नोंद घेत शासनाने उपाययोजना करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, मराठा आरक्षण विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. बहुसंख्य मराठा समाजला या निर्णयाचा फायदा होणार नाही. आम्हाला सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून हवी. आमचा हा हट्ट नाही. मात्र, आमचा अधिकार आहे. घाईगडबड नाही पण सहा महिन्यांचा कालावधी तुम्हाला दिला आहे. आंदोलनाची दिशा एका दिवसांत ठरवणार नाही. निर्णयक बैठकीत मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. आम्हाला न्याय मिळवायचा असला तर हा लढा उभा करावाच लागेल, अशी भूमिका जरांगे पाटील यांना मांडली.