अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती; म्हणाला, "कोणत्याही प्रकारे.."

    23-Dec-2024
Total Views | 57
 
allu arjun
 
 
मुंबई : अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपाटांचे रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १०६२ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये विशेष प्रिमियर आयोजित करण्यात आला होता ज्याच्यासाठी अल्लू अर्जूनसह रश्मिका मंदाना आणि इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात एका महिलेला जीव गमवावा लागला होता.
 
महिल्या मृत्यूमुळे अल्लू अर्जुनला काही दिवसांपूर्वी अटकही झाली होती. आता अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना कळकळीची विनंती करुन आवाहन केले आहे. त्याने लिहिले आहे की, "तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जबाबदारीने मांडा अशी मी सर्व चाहत्यांना कळकळीची विनंती करतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा आणि वर्तवणूक करु नका. बनावट ID आणि प्रोफाइलद्वारे कोणी माझ्या चाहत्यांची दिशाभूल करत असेल, याशिवाय कोणी अपमानास्पद पोस्ट करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा पोस्टमध्ये स्वतःला गुंतवू नका अशी मी चाहत्यांना विनंती करतो."
 

allu arjun  
 
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबाला अल्लू अर्जून आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलाच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांना ५ लाखांची मदत जाहिर केली होती.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121