मोठी बातमी ! पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफिसाठी टीम इंडिया खेळणार नाही

    08-Nov-2024
Total Views | 89
 
India Vs Pakistan
 
नवी दिल्ली : टीम इंडिया क्रिकेट संघाने २०२५ मध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही असे सांगितले. आपले सामने पाकिस्तानात न खेळवता दुबई येथील शारजाह स्टेडियम येथे खेळवावे. आमचा संघ पाकिस्तानातील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने  पीसीबीला पत्राद्वारे देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
 
फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. यासाठी आता टीम इंडिया व्यतिरिक्त इतर संघ भारत सोडून पाकिस्तानला जाणार आहेत. यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मिळालेल्या महितीनुसार, भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह 'अ' गटात सामिल करण्यात आले आहे. तसेच 'ब' गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
 
याआधीही २०२३ मध्ये आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या सामन्यासाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील होणारे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते.
 
बीसीसीआयने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफिसाठी पुन्हा एकदा अशीच मागणी केली आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? असा अनेकांना सवाल उपस्थित होत आहे. मात्र, बीसीसीआयने आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121