परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांचा पाक दौरा, एससीओ बैठकीत होणार सहभागी

    04-Oct-2024
Total Views | 28

Subramanyam Jay Shankar
 
नवी दिल्ली:  पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केली आहे.
 
पाकची राजधानी इस्लामाबाद येथे एससीओ शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये एससीओ सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. भारतातर्फे या शिखर परिषदेत कोण सहभागी होणार, याविषयी उत्सुकता होती.
 
परराष्ट्र मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकारपरिषदेत त्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पाकमध्ये होणाऱ्या एससीओ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेचे निमंत्रण भारतास प्राप्त झाले आहे. इस्लामाबाद येथे १५ आणि १६ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर करणार आहेत, असे जयस्वाल यांनी सांगितले आहे.
 
यानिमित्ताने २०१५ सालानंतर म्हणजे तब्बल ९ वर्षांनंतर भारतीय मंत्री पाकला भेट देतील. यापूर्वी २०१५ साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेच्या निमित्ताने इस्लामाबाद येथे गेल्या होत्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121