फडणवीसांनी वरळीत फोडली परिवर्तनाची हंडी; भाजपकडून उबाठाला पुन्हा धोबीपछाड

    07-Sep-2023
Total Views | 40
Deputy CM Devendra Fadnavis At Jambori Maidan Worli

मुंबई :
गेल्या काही वर्षांपासून राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने उबाठा गटाला धोबीपछाड दिली आहे. वरळीतील प्रतिष्ठित अशा जांबोरी मैदानावर सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचे यशस्वी आयोजन करून भाजपने सरशी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. ७ सप्टेंबर रोजी भाजप नेते आणि दहीहंडी पथकांच्या उपस्थितीत जांबोरी मैदानातील 'परिवर्तन' हंडी फोडली आहे. भाजप नेते संतोष पांडे यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

मागील वर्षी शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांमधील अंतर्गत कलह, शिंदे आणि अहिर यांच्यातील शीतयुद्ध आणि भाजपचा पवित्रा याचा फायदा घेत भाजपने जांबोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन करण्यात यश मिळवले होते. युवराज आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत गेल्या काही वर्षांपासून भाजपने आपली स्थिती मजबूत केली असून उबाठा गटाला शह देण्यात अनेकदा यश मिळवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मानाची हंडी समजल्या जाणाऱ्या वरळीतील मैदानावरील दहिहंडीवर भाजपने अपील प्रभुत्व मिळवले असून येत्या काळात दोन्ही पक्षातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121