'चांद्रयान- ३' च्या यशस्वी मोहिमेत ठाण्याच्या उद्योजकांचा सहभाग

    25-Aug-2023
Total Views | 90
H. D. Fire Protect Pvt. Ltd Contributed In Chandrayaan-3 Mission

ठाणे :
चांद्रयान- ३च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांचाही सहभाग मोलाचा ठरला. अग्निसुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या मिहिर घोटीकर यांच्या एच. डी. फायर प्रोटेक्ट प्रा. लि. कंपनीने एच डी वर्षा 'नॉझल्स' हे उपकरण 'इस्त्रो'ला तयार करून दिले होते. पृष्ठभागावर अवतरण होत असताना प्रचंड ध्वनिलहरी तयार होतात. त्यामुळे इस्त्रोच्या यंत्राचे नुकसान होऊ शकते. ते 'नॉझल्स'मुळे टाळले जाते. तर, या मोहिमेतील इंजिनामध्ये लागणाऱ्या 'फ्रिक्शन रिंग' हा अत्यंत महत्त्वाचा भाग शहापूरच्या साने बंधूंनी त्यांच्या कारखान्यातून बनवला आहे.

चांद्रयान- ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विश्वविजयी अवतरण करून संपूर्ण जगाला थक्क केले. या घटनेनंतर संपूर्ण जगभरातून भारत तसेच इस्त्रोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इस्त्रोच्या या यशात ठाण्यातील उद्योजकांचाही मोलाचा वाटा आहे. मुलुंड येथील मिहिर घोटीकर संचालक असलेल्या वागळे इस्टेट येथील एच. डी. फायर प्रोटेक्ट या अग्निसुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीमध्ये तयार झालेल्या एचडी वर्षा नॉझल्स (H D Varsha Nozzles) या उपकरणाचा वापर करण्यात आला.“नॉझलची संकल्पना इस्रोचीच होती. यान प्रक्षेपित होण्याच्या प्रक्रियेदरम्यान लाँच पॅडवर प्रचंड मोठा - ज्याला हाय डेसिबल म्हणता येईल असा ध्वनी निर्माण होतो. त्या ध्वनिलहरींची तीव्रता कमी करणारे विशिष्ट नॉझल्स कंपनीने बनवुन दिले.

तर, शहापूरचे सुरेश आणि गणेश साने यांच्या साने ब्रदर्स व एलोरा इंजिनियर्स या कंपनीनेही महत्त्वाचे उपकरण तयार केले. साने यांचा कारखाना माजिवाडा आणि आसनगाव येथे आहे. मंगळ मोहीम आणि चांद्रयान एक, दोन -आणि आता तिसऱ्या मोहिमेतही साने यांनी यानाच्या इंजिनसाठी 'फ्रिक्शन रिंग' बनवून दिल्या होत्या. साने यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे २०१३ मध्ये इस्रोने सुवर्ण पदक देऊन त्यांचा गौरव केला होता. चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर, इस्रोने साने बंधूंना मोबाइलवर संदेश पाठवून साने व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

इस्रो ही गेली अनेक वर्षे एचडी फायर प्रोटेक्ट या कंपनीशी संलग्न असून चांद्रयानच नव्हे, तर संस्थेच्या विविध प्रकल्पांत या कंपनीच्या उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे. चंद्रयान- २ मध्येही आमचा सहभाग होता.लाँचरमधील पाणी हे ध्वनिलहरी शोषून घेतात. वाहत्या पाण्याचा उच्च वेगात मारा केला. तर, हा ध्वनी नियंत्रित होऊ शकतो. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून या उपकरणाची तपासणी करण्यात आली होती. नॉझल्स उपकरणामुळे अवतरण करताना ध्वनी लहरी नियंत्रित ठेवता येतात. यापूर्वीही इस्रोच्या काही मोहिमेत नॉझल्स उपकरणाचा वापर झाला आहे.

- मिहीर घोटीकर, संचालक, एच.डी.फायर प्रोटेक्ट प्रा. लि.


अग्रलेख
जरुर वाचा
कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई ..

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121