मुंबई : समृद्धी महामार्गावर ३० जून च्या रात्री भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यांनतर दि. १ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपघातस्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी फडणवीसांनी या घटनेची कडक चौकशीचे आदेश दिले आहेत.
फडणवीस म्हणाले की, या अपघातात २५ जणांचा मृत्यु झाला असुन ८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार बसच्या डिझेलची टाकी फुटल्याने बसला आग लागली असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तसेच मृतांच्या परिवाला ५ लाखांची मदत आणि जखमीच्या उपचारासाठी शासन खर्च करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग अपघात होणार नाहीत , अशी सिस्टम लावणार आहे. मात्र अपघात होणार नाही त्यासाठी प्रबोधन करणार असल्याचे ही फडणवीस म्हणाले.यावेळी फडणवीसांनी या घटनेची कडक चौकशीचे आदेश ही दिले आहेत.