केसीआर यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ!
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
27-Jun-2023
Total Views | 260
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसीआर यांना फटकारलं आहे. पंढरपूरमधल्या सरकोली गावात बीआरएस पक्षाची सभा झाली. भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी केसीआर यांनी सभेला संबोधित केलं. तेव्हा केसीआर यांनी सर्वच राजकीय पक्षांना सवाल केले. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं.
शिंदे म्हणाले, "केसीआर किंवा अजून कुणीही आलं तरी आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. महाराष्ट्राची जनता ही समजदार आहे. जे काम करतं त्यांच्या पाठीशी जनता उभी राहाते. आमच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे." मुंबईत पावसाचे पाणी साचले, यावर विचारले असता शिंदे म्हणाले, "मुंबई तुंबली, ही तुमच्यामुळे. तुम्ही निर्णय घेतले नाहीत. 15 वर्ष लोकांची लूट केली. हजारो कोटी रूपये मुंबईच्या जनतेचे ओरबाडले." असा पलटवार शिंदेंनी केला.