बंगळुरू:चांद्रयान २ च्या अपयशानंतर भारताची महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान – ३ यशस्वी करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रोने) कंबर कसली आहे. 'इस्रो'चे अध्यक्ष 'एस सोमनाथ' यांनी 'नेव्हिगेशन उपग्रह' 'एनएसव्ही ०१' च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
'चांद्रयान ३ 'जुलै महिन्यात उड्डाण करणार आहे,असे 'एस सोमनाथ' यांनी जाहीर केले. चांद्रयान २ मध्ये लँडर यशस्वीपणे उपग्रहास 'लँड'न करू शकल्यामुळे ही मोहीम अयशस्वी झाली होती. त्यामुळे चांद्रयान ३ या मोहीमेत फक्त 'लँडर' आणि 'रोव्हर' पाठवण्यात येणार आहे.चांद्रयान – २ मध्ये ऑर्बिटर चंद्राच्या भोवती स्थापित केला गेला होता.