मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. "जो आपली आई बदलतो, त्यांच्यावर आम्ही काय बोलावं? राणेंनी आतापर्यंत १० वेळा आपला पक्ष बदलला, आपली आई बदलली." असं राऊत म्हणाले.
“नारायण राणेंचं नाव घ्यायलाही आम्हाला लाज वाटते. कोण आहेत हे लोक, यांनी १० वेळा पक्ष बदलले, आपल्या आईला बदललं. जो आपली आई बदलतो, त्यांच्यावर आम्ही काय बोलावं. ते मंत्री बनले आहेत. बेईमान लोकांना मंत्रीपद देणं भाजपाची सवय झाली आहे. यात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, जोतिरादित्य शिंदे असो की एकनाथ शिंदे, नारायण राणे.”
" आपल्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेतलं असून त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत. मी स्वतः गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय कडे या राज्यातले दोन प्रकरण पाठवलेत. 500 कोटी मनी लाँडरींग प्रकरण आहे. भीमा पाटस साखर सहकारी कारखान्याचं. भाजप आमदार राहुल कुल सध्याचे गृहमंत्री यांचे राईट हॅन्ड यांचा तो कारखाना आहे. त्यांनी ५०० कोटी कसे बुडवले हे सगळं पुराव्यासह पाठवलं आहे, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्याच प्रमाणे दादा भुसे यांनी गिरणा अॅग्रो सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे शेअर्स गेतले पण साखर कारखानाही चालला नाही. हे पैसे गेले कुठे." असा सवाल राऊत यांनी केला.