मुंबई उपनगरमधील 'सरकार आपल्या दारी उपक्रमात १५०० तक्रारी दाखल

दाखल तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी - मंगलप्रभात लोढा

    19-Apr-2023
Total Views | 74
Mangalprabhat Lodha news


मुंबई
: 'सरकार आपल्या दारी उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी आपल्या समस्या महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये मांडल्या. स्थानिक प्रशासनाने १५०० तक्रारी पडताळून घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी, ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे तसेच निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देता येवू शकतो ही माहिती द्यावी अशा सूचना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या.

ग्रँट रोड येथील मुंबई महापालिकेच्या डी वॉर्ड मध्ये सरकार आपल्या दारी उपक्रमांतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी मुंबई महानगपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा,वीर माता तथा सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे , परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ.अभिनव देशमुख, मुंबई महापालिके च्या उपायुक्त डॉ संगीता हसणाळे,डी वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे "सशक्त नारी-समध्द भारत" हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागांतर्गत सरकार आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे.प्रत्येक विभागाने आलेल्या तक्रार अर्जावर १५ दिवसात सर्व विभागांनी कार्यवाही करावी.पावसाळ्यापूर्वी मुंबई उपनगर परिसर मधील स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व कामे करावी.म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास बाबत महानगरपालिका आणि म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती पर कार्यशाळा आयोजित करणार असून अनेक ठिकाणी अवैध धंदे यांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी गस्त करणे गरजेचे आहे जेणेकरून महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे शक्य होईल.

वाहतूक समस्या,पिण्याच्या पाण्याची समस्या,शाळेत प्रवेश मिळत नाही,आरोग्य सुविधा देणे,सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यावर कारवाई करावी,कचरा पेटीची व्यवस्था करणे, ड्रेनेज ची पाइप लाईन फुटली आहे अशा तक्रारी वर प्रत्येक स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी.काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना मुंबई महानगर पालिकेकडून वेळेत पाणी मिळत नाही.आजूबाजूला असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था मोटार लावतात अशा गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करावी.ज्या महिलांना रोजगार आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे.तसेच निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देता येवू शकतो ही माहिती द्यावी अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी दिल्या.

सरकार आपल्या दारी अभिनव उपक्रम : वीर माता अनुराधा गोरे

महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सरकार आपल्या दारी हा अभिनव उपक्रम असून तो मुंबई शहर आणि उपनगर मध्ये सर्वत्र राबवावा असे मत वीर माता तथा सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. श्रीमती गोरे यांच्या हस्ते सरकार आपल्या दारी उपक्रमांतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रम पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी २५० महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डी वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देणारे स्टॉल ही लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


३१ मे २०२३ पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार

महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन,मुंबई महानगरपालिका आणि एकात्मिक बालविकास योजना आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने 'सरकार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम दि.१९ एप्रिल पासून ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी तीन ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.







अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121