नाशिक : “देशभरात श्रद्धा वालकरसारख्या घटना मोठ्या संख्येने घडत आहे. वनवासी बांधवांसह अनेक हिंदूधर्मीयांचे आमिष दाखवून धर्मांतरण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतरण विरोधात तत्काळ कायदा करून भारताला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करा, अशी मागणी सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी केली.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर गुढीपाडव्याला हिंदू हुंकार सभा झाली. हजारो हिंदूंच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत देशभरात वाढत असलेले ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार, लॅण्ड जिहाद, आदिवासींसह ग्रामीण भागांत आमीष दाखवून केलेले धर्मांतरण याविरोधात यावेळी एकनिश्चयाने विरोध करण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच या सभेतून हिंदूराष्ट्र निर्माणाची हाक देण्यात येऊन ठराव मंजूर करण्यात आला. सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, “हिंदूंच्या शांततेच्या भूमिकेमुळे भारतातील प्रत्येक मंदिरांभोवती मशीद, दर्गा उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे अतिक्रमणही दररोज वाढत आहे. त्यासाठी भारतात कठोर जनसंख्या नियंत्रण कायदा आणून हिंदू राष्ट्र घोषित करणे गरजेचे आहे.”
“धर्मनिरपेक्ष व्यवस्थेमुळे देशात हिंदू धोक्यात आला आहे. धर्मग्रंथांचे विडंबन, हिंदूंच्या हत्या, देवतांचे विडंबन, साधूंच्या हत्या होत आहेत. कोणताही आयोग हिंदूंसाठी नाही. घटनेच्या माध्यमातून बहुसंख्यांक असलेल्या हिंदूंवरच अन्याय केला जात आहे,” असे चव्हाणके म्हणाले.यावेळी आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी हरिगिरीजी महाराज, स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, राष्ट्रसंत अनंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्री श्री 1008 महामंडलेश्वर रघुनाथ बाबा, जगद्गुरु द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, नागेश्वरानंद महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवरायांचे विचार आत्मसात करा
“ ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली माता-भगिनींवर अत्याचार घडत आहे. देशात मशिदींची संख्या वाढत आहे. जिथे हिंदूंची संख्या जास्त होती तेथे ते अल्पसंख्याक झाले. सावरकरांच्या भगूर गावात वसुबारसाच्या दिवशी गाईंच्या कत्तली होत आहे. हिंदूंच्या शांततेच्या भूमिकेनेच हे सर्व प्रकार घडत आहे. यासाठी हिंदूंनी शिवरायांचे विचार आत्मसात करून यांचे हात छाटले पाहिजे,” असेही चव्हाणके म्हणाले.